बाळासाहेब ठाकरे यांनी हयात असतानाच त्यांचा राजकीय वारसदार म्हणून उद्धव ठाकरे यांना निवडलं होतं
मुख्यमंत्री असावा तर, उद्धव ठाकरेंसारखा….
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मला आज माँ व बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते. माँची संवदेनशीलता उद्धव ठाकरेंमध्ये दिसते. बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावरही लहानपणापासून खूप प्रेम केलं. त्यांनी हयात असतानाच त्यांचा राजकीय वारसदार म्हणून उद्धव ठाकरे यांना निवडलं होतं. ते आज प्रेमाने आवाहन करत असतील तर ते महत्त्वाचं आहे. त्यांचा तो खरेपणा आहे. राजकारणात चढउतार येत राहतात, शेवटी माणसं व नात्यांमधील ओलावाच टिकतो.मुख्यमंत्री असावा तर, उद्धव ठाकरेंसारखा.
घरातील मोठा भाऊ कसा असतो हे उद्धव ठाकरेंनी दाखवून दिले. ते सर्वांच्या चुका पोटात घेत आहे. बाळासाहेबांची छवी ही उद्धव ठाकरेंमध्ये दिसून येते. स्वत: बाळासाहेबांनी ही जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे. त्यांचे आवाहन हे भावनिक आहे.
सोशित, पीडित वंचितांसाठीचे जीआर काढले. ते चांगलेच काम करीत आहेत उलट याचे कौतूक करायला हवे. मात्र त्यांवरही लोक टीका करताय असा टोला त्यांनी लगावला आहे. आज बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते. उद्धव ठाकरे यांचे ट्विट पाहिले. बाळासाहेब ठाकरे आणि माॅंसाहेब यांनी शिवसेना उभारली. शिवसेना कुटुंबासारखी सदैव टिकून राहील असेही त्या म्हणाल्या.बैठका घेण्याचे अधिकार भाजपला आहे. त्यामुळे आम्ही त्यांना नाही म्हणणारे कोण, हे द़डपशाहीचे सरकार नव्हते आणि नसेल. जनतेच्या हितासाठी जीआर काढले हेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. कुटुंबात भांड्याला भांडे लागतेच असेही सुळे म्हणाल्या. सत्ता येते आणि जातेय. मात्र जे काम सुरू आहे ते जनतेच्या सेवेसाठी आहे. वंचित, पिडीतांच्या सेवेसाठी जीआर काढत आहे. नाती असतात तेव्हा जवाबदाऱ्या येतात. भाजपसोबत सरकार बनवले तर ते वापस येतील असे ते म्हणतात पण बाळासाहेब आणि माँसाहेब ठाकरेंचे उत्तराधिकारी उद्धव ठाकरेच आहेत. जी समस्या आहे ती घरी येऊन एकनाथ शिंदेंनी सांगायला हवे. संवाद करायला हवा. उद्धव ठाकरे समोरा-समोर बसायला तयार आहेत. असे म्हणत बंडखोर आमदारांना एकप्रकारे आवाहन केले आहे.