पुणे- महाराष्ट्र आणि दिल्ली भाजपा,२ शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या आपसातील ताणाताणीत..आता ह्याला गँगवॉर ही कोणी म्हटलं तर आपण काय करावं..राजकीय चढाओढ नाहीच, हे राजकीय युद्धच म्हणावं लागंल..अशा परिस्थितीत कोरोना ची साथ आणि मंग काय निवडणुकीला लाथ…अशी स्थिती झालीय सध्याला…
व्हय तर..तुमास्नी तात्या ठाऊक आहे कि नाय ? अहो तात्या.. त्याच्या पक्षाचा हाय त्यो वाघ…पण त्योही हतबल झालाय…
अहो नाय ओ..त्यांच्या पक्षाचं जाऊ द्यात..तात्या.या पुढे पुढे जाणाऱ्या महापालिका निवडणुकांबद्दल बोललात बघा…काय बोललात,ठाऊक हाय काय ?
ऐकाच तात्याच्याच शब्दात…
राजकारणाच काय खरे नाही,निवडणुका ही लोकं कधी घेतील माहिती नाय बाबा…जरा उद्योग व्यावसायाकडे लक्ष केंद्रित करतो…लग्न,पार्टी,स्वागतसमारंभ,वाढदिवस यांसाठी अमुक तमुक कार्यालय संपर्क – नाव आणि मोबाईल नंबर
आता वेताळाच्या पाठीवर बसलाय..कोण ? व्हय…प्रशासक..काय त्याच नांव ते तुमीच बघा…
आता म्हनं त्याचंच राज्य..त्योच करतो,ठरवतो सारं..अर्थात..कोणतीबी कार्पोरेशन असू द्यात किती बी हजार कोटीचे बजाट असू द्यात पहा..त्ये सारं कुणाच्या हुकुमाबरं चालतंय…
अहो दीड दोनशे नगरसेवक बसविण्यापेक्षा त्यांना ह्योच प्रशासकीय कारभार बरा वाटणार नव्हं..
अगदी बराबर,बघा म्हणून तर अगदी..तात्यांनी पण..टाकली बघा…
हतबल झालेत सारेच..आता म्हणे कामंधंद्याला लागा…करू द्यात त्यांना काय करायचं त्ये..
आता बघा लोकशाहीची तर..कायच नाय उरली तमा…अन दरवेळी म्हणं..निवडणुकीला जरा दमा..
नेते म्हनं खुदकेच लियेही जिते..
कार्यकर्ता को क्या,कहीभी छोड देते..