Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

समाज परिवर्तनात सेवाभाव व समन्वयाची भूमिका महत्त्वाची – डॉ. उमराणी

Date:

पुणे-उत्तम शिक्षणातून नीतिमत्ता वाढीबरोबर रोगजार निर्मिती होते. त्यातून समाज परिवर्तन अपेक्षित असते. समाज परिवर्तन होत असताना सेवाभाव आणि समन्वयाची भूमिका  महत्त्वाची असते असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. नेहरु उमराणी यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा ‘प्रथम अध्यक्ष राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार’ मुंबईत रचनात्मक आणि विधायक कार्य करणार्‍या ‘समता परिषदे’ला प्रदान करताना डॉ. नेहरु उमराणी बोलत होते. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते.
समता परिषदेच्या वतीने अध्यक्ष आमदार भाई गिरकर यांनी पुरस्कार स्वीकारला. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. सामाजिक कार्यकर्ते भिकूजी तथा दादा इदाते, सोसायटीचे कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, माजी अध्यक्ष डॉ. अजित पटवर्धन, निवृत्त हवाई दल प्रमुख भूषण गोखले, फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी, बीएमसीसीचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. उमराणी पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्राची वैचारिक नाडी आणि धाटणी जरा वेगळी आहे. त्यामुळे धोरणकर्त्यांचे विशेष लक्ष असते. या जडणघडणीत शाहू, ङ्गुले, आंबेडकरांच्या मूलभूत विचारांची महत्त्वाची भूमिका आहे. या विचारांबरोबर संतांची चळवळ आणि नीतिमान उद्योजकांची परंपरा आहे. या सगळ्या विचारांचे सूत्र ‘समता’ आहे. समता परिषद याच उद्देशाने कार्यरत आहे. अशा संस्थांमध्ये नवीन प्राध्यापक आणि पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या विद्यर्थ्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे.’
श्री. इदाते म्हणाले, ‘समन्वय व सेवा या सूत्रांचा विस्तार केल्यास समरसतेची स्थापना होते. आपल्या देशाच्या खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक एकात्मतेचे प्र‘गटीकरण म्हणजे समरसता. देश एकात्म करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. हा मार्ग आपआपल्या काळात शोधणे आवश्यक आहे. त्यानुसार कृती करणे सामजिक परिवर्तनासाठी आवश्यक आहे.’
श्री गिरकर म्हणाले. ‘बहुजन व दलितांनी एकत्र येऊन समाजाचा विकास होईल या भावनेतून समता परिषदेचे कार्य सुरू आहे. समन्वय व सेवेच्या माध्यमातून समाज परिवर्तन व समाज जोडण्याचे काम आम्ही करतो. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार क्षेत्रात आम्ही काम करतो. सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळावीत यासाठी परिषदेच्या वतीने मोहीम हाती घेण्यात आली आहे.’
डॉ. कुंटे म्हणाले, ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी सामाजिक जागृतीचा वसा घेऊन कार्यरत आहे. देशभक्त युवक तयार करण्याच्या ध्यासातून संस्थेचे कार्य सुरू आहे. समाजातील मागासलेल्या घटकांना बरोबर घेऊन काम करण्याची संस्थेची परंपरा आम्ही पुढे नेत आहोत.’ डॉ. श्रीकृष्ण कानेटकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रसन्न देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. बीएमसीसीचे उपप्राचार्य डॉ. आशीष पुराणीक यांनी परिचय करून दिला.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...

यंदाचा रविकिरण फिरता सुवर्णचषक कल्याण – वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल’ शाळेकडे!

'दिव्या खाली दौलत'ला द्वितीय तर 'रंग जाणिवांचे' तृतीय क्रमांकाने...