ब्रिटीश राजवटीत १८८६ मध्ये तत्कालीन रे मार्केट पूर्ण
झाले आणि भाजीपाल्याचा मोठा व्यापार सुरु
झाला .
साजीकच व्यापारी , शेतकरी , हमाल
आणि भाजीविक्रेते यांचा राबता येथे सुरु झाला .
येथील डोंगरे पैलवान काची यांना मुलबाळ नव्हते.
तेव्हा त्यांनी तुळजापूरच्या भवानी मातेला नवस
केला .
आपत्य प्राप्तीझाल्यावर तुळजापुर
मंदिराच्या कळसावर विराजमान
असलेल्या शारदा गजाननाची मूर्ती बनून
प्राणप्रतिस्थापना करण्याचा नवस होता .
पुढे त्यांना आप्त्यप्राप्ती झाली .
मग त्यांनी शारदा गजाननाची मूर्ती बनून
घेतली आणि गणेशाचा उत्सव सुरु झाला .
उजव्या सोंडेची हि सिद्धीविनायेकाची शारदा गजाननाची मूर्ती अबालवृद्धांच्या
डोळ्यांचे पारणे फेडते .
तर दर ३ वर्षांनी गणेशउत्सवात या गणेशाचा उत्सव
हा झोपाळ्यावर बसवतात,
या परंपरेमुळे हा गणपती ” झोपाळ्यावरिल गणेश ”
म्हणूनही प्रसिद्ध आहे .
आपल्या अखिल मंडई मंडळाची स्थापना १८९४ मध्ये
झाली.
त्या काळातील हि ” ईको फ्रेंडली ” मूर्ती आहे .
चिंध्या , कागदाचा लगदा ,
लाकडाचा भुसा यांचा वापर तयार करून ती तयार
करण्यात आली आहे .
या परिसरात सर्कसचे खेळ होत असत .
यापैकी एका सर्कस मधील हत्तीचे पिल्लू मरण पावले .
त्याचा देह याच परिसरात पुरण्यात आला .
त्याच भागात गणेशोत्सव १० साजरा केला जातो.
-संकलक – चंदन शांतीलाल सुरतवाला