पुणे-येथील एका कार्यक्रमात घेण्यात आलेल्या प्रगत मुलाखतीत शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले कि,’ भाजपने विरोधी बाकावर बसण्याची तयारी ठेवावी. पुढील अडीच वर्षेही सुखरूप पूर्ण होतील. महाराष्ट्र लढणारा आहे. कोणासमोरही झुकणार नाही. देशामध्ये बदल घडवण्याची महाराष्ट्राची ताकद. मी बाळासाहेबांनाही पाहिले आणि शरद पवारांना पाहिले. दोघेही लोकांमध्ये राहतात. तीच त्यांची ऊर्जा. पवारांमध्ये कोणताही बदल नाही. तेच आहेत तसेच आहेत. भाजपच्या लोकांवर ईडीचे छापे पडत नाहीत…2024 नंतर याचे उत्तर देतो. आमचेही दिवस येतील.
देशात भाजपचे राज्य आहे. त्यांना महागाईवरून लक्ष हटवायचे आहे. आणि ज्ञानव्यापी, शिवलिंग असे विषय काढले जातात. काही लोकांना आपल्या देशाची तुलना श्रीलंकेशी केलेली आवडत नाही. मात्र, श्रीलंकेसारखी ठिणगी इथे पडायला वेळ लागणार नाही. माझ्यासारख्या माणसाने नसलेली प्रॉपर्टी कोणतीही नोटीस न देता ताब्यात घेतली. आणि म्हणतात अटक करणार अटक करणार मी सांगितले मी दिल्लीत बसलोय मला अटक करा. असे म्हणत त्यांनी भाजपला इशारा दिला आहे
बाळासाहेबांची करून दिली आठवण
बाळासाहेब असते तर हे असे उद्योग करण्याची हिंमत झाली नसती, हे लोक तेव्हाही मातोश्रीत येण्यास घाबरत होते, आणि आताही घाबरतात असे म्हणत राऊतांनी भाजपला टोला लगावला आहे. नक्कीच त्यांचा प्रभाव आहे. बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा, आताही आमच्या पक्षामध्ये पक्ष मोठा लढवय्ये लोक आहेत. अजूनही त्यांची भूमिका त्यांच्याच भाषेत लिहिले जातात. बाळासाहेब असते तर आज जे उपद्वव्याप करतात ते झाले नसते. ते बाळासाहेबांना चळाचळा कापायचे. आमचे सध्याचे नेते सुसंस्कृत आहेत. अंगावर आला तरी आम्ही शिंगावर घेतो. प्रभाव आहे, तो राहिला पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण, प्रभाव राहिला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी एकत्र व्यासपीठ शेअर केलेय. आता जो संभ्रम निर्माण करतायत, त्यांना बाळासाहेबाचे विचार माहित नाही. मी त्यांची शिकवणी घ्यायला तयार आहे. भारतीय जनता पक्षाचे आभारा मानले पाहिजेत. त्यांनी महाराष्ट्राच्या मनातले सरकार आणायला भाग पाडले. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.