पुणे –राज्यभरात धनगर,मराठा समाजातील तरुणांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करुन सरकारकडे आपल्या मागण्या मांडाव्यात .हिंसक पध्दतीने आंदोलन करुन काही मिळणार नसुन जनतेचे नुकसान होणार आहे केंद्रात कायदा सर्वपक्षीय आता करून घेणार आहेत ..त्याशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही अस मत केंद्रीय सामाजिक राज्य न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यकत केले
पुण्यात आझम कँम्प येथे रिपब्लिकन पार्टीच्या मुस्लिम विभागाच्यावतीने मुस्लिम बांधवाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रामदास आठवले, उपमहापौर सिध्दार्थ धेंडे,रसिद शेख आदि मान्यवर उपस्थित होते. मुस्लिम समाज हा जरी अल्पसंख्याक समाज असला तरी तो आपला आहे. या समाजातील तरुणांना रोजगार,शिक्षण हे मिळालेच पाहिजे या करता जे पाच टक्क्याचे आरक्षण आहे.त्यासाठी माझा प्रयत्न सुरु राहणार असुन त्याला संविधानिक महत्व दिले तर त्या आरक्षणाला महत्व आहे. पुणे जिल्ह्यासोबत इतरही सहा जिल्ह्यातुन हज यात्रेसाठी मुस्लिम बांधव मोठया संख्येने जात असतात.तर त्यांना पुण्यातुन रात्रीच्या सुमारात जर पुणे ते हज विमानसेवा देण्यासाठी मी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांच्याशी बोलुन ही सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने केंद्राकडे मसुदा पाठवु दयावा त्यानतंर केंद्रात त्याचा कायदा झाला तरच याला कोणीही न्यायालयात आव्हान देऊ शकणार आहे. यासाठी मी स्वता पंतप्रधान यांच्याशी बोलणार असल्याचे आठवले यांनी यावेळी सांगितले दरम्यान लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त रामदास आठवले यांनी सारसबाग येथील अण्णाभाऊ साठेच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.