पानिपत हा अजोड शौर्य -जिद्द आणि समर्पणाचा आविष्कार

Date:

डॉ. आनंद भालेराव यांचे प्रतिपादन 
पुणे :’दिल्लीचे तख्त राखण्याची जबाबदारी असल्याने मराठे अब्दालीच्या बंदोबस्तासाठी उत्तरेत गेले , दक्षिण ,उत्तर आणि राजस्थानातील राजे मराठ्यांच्या मदतीला आले नाहीत तरीही  पानिपतला मराठी सैन्याने शौर्याची पराकाष्ठा केली. पानिपत हा मराठी सैन्याच्या अजोड शौर्य -जिद्द आणि समर्पणाचा आविष्कार आहे,असे प्रतिपादन भारती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी केले .
  भारती अभियांत्रिकी महाविद्यालय कला मंडळात झालेल्या ‘पानिपतची शौर्यगाथा ‘ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. हा कार्यक्रम शुक्रवारी सायकाळी झाला.
युद्धाची पार्श्वभूमी सांगताना डॉ भालेराव म्हणाले ,’शिव छत्रपती आणि पानिपत हे दोन्ही कालखंड मराठी माणसाच्या मनात रुतलेले कालखंड आहेत . बाजीराव पेशव्यांच्या काळात मराठी साम्राज्य अटकेपार गेले . लाहोर ,अटक,सिंधू नदी आणि पूर्वेकडे दिनापूर ,बंगाल,कटक पर्यंत मराठी फौजांचा संचार झाला . दिल्लीचे तख्त राखण्याची जबाबदारी मराठ्यांवर होती . परकीय आक्रमण असलेल्या अब्दालीला भारतात टिकू न देणे हे मराठी सैन्याने परम कर्तव्य मानले . पराक्रमाची शर्त करीत जिंकत आणलेले युद्ध मराठे हरले. परस्पर वर्चस्वाच्या स्पर्धेमुळे अविश्वास असणारे उत्तरेतील मराठे सरदार हे पराभवाचे एक कारण ठरले . अब्दालीला भरलेल्या  नद्या पार करण्याचे तंत्र अवगत होते ,गनिमी काव्यात तो वरचढ होता . घनघोर युद्धात मातब्बर पडल्याने आणि काही निघून गेल्याने मराठे सैन्य हतबल झाले आणि पराभूत झाले . पानिपत चा रणसंग्राम जिंकला तरी अब्दालीने इतकी हाय खाल्ली कि दिल्ली ताब्यात ने घेता तो परत अफगाणिस्तान ला गेला आणि पुन्हा कधीही आक्रमण करून भारतात आला नाही . हे मराठी सैन्याचे यशच आहे .
शूरपणे लढणारा कोवळा विश्वासराव ,’बचेंगे तो औरभी लढेंगे ‘ म्हणणारे दत्ताजी ,बळवंतराव मेहेंदळे यांचा पराक्रम ,विश्वासराव भाऊ यांच्याशी एकनिष्ठ राहणारा इब्राहीम खान गारदी ,विश्वासराव जखमी झाल्यावर हताश होणारे सदाशिवरावभाऊ अशा असामींमुळे पानिपत अजरामर ठरले,असे डॉ भालेराव यांनी सांगितले.
परकियांच्या विरोधात ताकदीने उभे राहिलेल्या आणि तत्वासाठी लढलेल्या मराठ्यांच्या पानिपत लढाईचा इतिहास आपण शौर्याचा -पराक्रमाचा इतिहास म्हणून जपला पाहिजे .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित-युगेंद्र पवार मैदानात:बारामती पोलिस ठाण्यात दाखल; समर्थकांची गर्दी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

दिल्ली पोलिसांवर हिमाचलमध्ये गुन्हा दाखल,हिमाचल पोलीस म्हणाले,इकडे मनमानी नाही चालणार,नाकेबंदी करून थांबवले

शिमला-हिमाचल प्रदेशमध्ये दिल्ली पोलिसांवर बुधवारी एफआयआर (FIR) दाखल करण्यात...

मुंबई महापालिकेचे बजेट 80,952 कोटींचे,पण तब्बल 36 हजार कोटींच्या ठेवी वापरणार….

मुंबईकरांसाठी या अर्थसंकल्पात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे....

बदलत्या काळानुसार पत्रकारांनी तंत्रस्नेही होणे गरजेचे – प्रा. सुशोभन पाटणकर

ए आय तंत्रज्ञानाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी शहानिशा आवश्यक पिंपरी,...