पुणे :’अवामी महाज’ आयोजित ईद मिलन स्नेह मेळावा शनिवारी सायंकाळी उत्साहात पार पडला. समाजातील विविध मान्यवर, सर्वधर्मीय, सर्वपक्षीय कार्यकर्ते, संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले.
डॉ.कुमार सप्तर्षी ,सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी, खा. वंदना चव्हाण, आ. जयदेव गायकवाड, डॉ. उर्मिला सप्तर्षी,मोहन सिंह राजपाल, सय्यदभाई, शमसुद्दीन तांबोळी, मोहन जोशी, डॉ. सतीश देसाई,दीप्ती चवधरी, चेतन तुपे, अभय छाजेड , अविनाश बागवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
अवामी महाज ‘ चे अध्यक्षडॉ.पी. ए. इनामदार , आबेदा इनामदार, लतीफ मगदूम,वाहिद बियाबानी, शाहीद शेख यांनी स्वागत केले.
यावेळी ‘नादब्रह्म संगीतालय, अहमदनगर ‘ यांच्या वतीने सुफी दरबार चे आयोजन केले होते. पवन श्रीकांत नाईक (अहमदनगर) यांच्या सुफी गायनाच्या सुफी दरबार कार्यक्रमाने वातावरणात रंगत आणली.
अल्लाह (जिक्र) ने दरबार ची सुरुवात झाली. मोहंमद प्रेषित पैगंबरांवरील ३ रचना सादर केल्या गेल्या. यामध्ये ‘फर्श पे रेहकर अर्श पे जाना’, ‘भर दो झोली मेरी या मोहंमद’, ‘जिक्रे एहमद से दिल को सजा लिजिए’, आध्यत्मिक तत्वज्ञानाची ‘बेखुद किए देते है’, प्रसिद्ध रचना ‘ख्वाजा मेरे ख्वाजा’, ‘फुल रही सरसो ही पारंपरिक हजरत आमीर खुसरो यांची रचना, ‘छास तिलक’, तेरे वाज्जो’, ‘आफरीन- आफरीन’ या रचना सादर झाल्या. संत सोयराबाईंची ‘ हरी भजनाविण काळ ‘ ही रचनाही सादर करण्यात आली.
ईश्वरी तत्वज्ञानापासून ते मानवतावाद असा सुफी सांप्रदायातील सुंदर प्रवास या मैफिलीचा माध्यमातून उलगडला .
या मैफिलीत अरबी, उर्दू, पंजाबी, ब्रज, हिंदी अशा विविध भाषांमधून रचना सादर करण्यात आल्या.
कल्याण मुरकुटे, नरसिंह देसाई ,पंकज नाईक यांनी हार्मोनियमवर, कुलदीप चव्हाण (बेंजो), हर्षद भावे (तबला) ,विश्वजित कुलकर्णी (तबला, जंबे, डफ) यांनी पवन नाईक यांना साथसंगत केली.
पंकज नाईक यांच्याबरोबर संकेत गांधी, पवन तळेकर, हरीश कुटे, अविनाश तिजोरे, नवरतन वर्मा, मुलांशु परदेशी, रिझवान शेख, विजय जाधव, सय्यद एहमद, उद्धव म्हस्के, भालचंद्र जाधव, संहिता परदेशी, उज्वल कुलकर्णी यांनी सहगायन केले.
कार्यक्रमाचे निवेदन वीणा दिघे यांनी केले. या सुफी दरबार विशेष मैफिलीत सुफी तत्वज्ञानातील विविध रहस्य उलगडले गेले.
उपस्थितांनी शीरखुर्मा, पुरणपोळी तसेच दालचा या पदार्थांचा आस्वाद घेतला.
हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी असेम्ब्ली हॉल, आझम कॅम्पस येथे झाला.
‘ईद मिलन’ हे सामाजिक सलोखा, संवादाचे माध्यम व्हावे, भेटीगाठी व्हाव्यात, संवाद व्हावा , यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे डॉ.पी. ए. इनामदार यांनी सांगीतले.