‘भारतीय विद्या भवन’मध्ये उलगडले रागदारी आणि लोकसंगीताचे नाते
‘गोफ स्वरांचा’ कार्यक्रमाने जिंकली रसिक मने
पुणे :
‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘गोफ स्वरांचा’ या सांगितिक कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली. हा 47 वा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह’, सेनापती बापट रोड येथे झाला.
‘भारतीय विद्या भवन’ च्या कार्यक्रमात रागदारी आणि लोकसंगीताचे नाते उलगडले गेले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन रंजना काळे यांनी केले.
या कार्यक्रमात डॉ. राजश्री महाजनी, माधुरी करंबेळकर, रंजना काळे यांनी गायन सादर केले. राग संगीत, नाट्यसंगीत, टप्पा, दादरा, धून अशा विविध रचना सादर केल्या.
सतार आणि व्हायोलिन च्या सुरेल सुरात रसिक भारावून गेले.
जया जोग (सतार), डॉ. नीलिमा राडकर (व्हायोलिन), अमृता माळी-जाधव (हार्मोनियम), भावना टिकले (तबला) या कलाकारांनी साथसंगत केली होती.
डॉ. राजश्री महाजनी, माधुरी करंबेळकर, रंजना काळे यांच्या गायनाने सभागृहाचे वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात राग भीमपलास ने झाली. नंतर ठुमरी, पहाडी (नादवेध) रागातील गाण्याने रसिकांची वाहव्वा मिळविली. कार्यक्रमाची सांगता भैरवीने झाली.
भारतीय विद्या भवन ने गेल्या पावणे दोन वर्षात देशभरातून 11 राज्यात 422 कार्यक्रम राबविले. साडे तीन हजाराहून अधिक कलाकारांनी या कार्यक्रमाद्वारे आपली कला सादर केली, असे काकिर्डे यांनी प्रास्ताविकात सांगितले.