‘काव्य सप्ताह’ २०१७ चे उद्घाटन
पुणे :कवीनी कवींसाठी आयोजित केलेल्या आणि कविता प्रेमींचा वार्षिक आनंदोत्सव अशी ख्याती असलेल्या ‘काव्य सप्ताह’ २०१७ चे उद्घाटन रसिक मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला, ‘प्रबोधन माध्यम’ चे संस्थापक दीपक बीडकर यांच्या हस्ते झाले.
संयोजक ज्येष्ठ कवी रमेश गोविंद वैद्य यांनी स्वागत केले.
विश्वास वैद्य यांच्या चित्रप्रदर्शनाचे उ्दघाटन यावेळी करण्यात आले. ‘काव्य सप्ताह’ उपक्रमाचे हे 18 वे वर्ष आहे.
स्काऊट हॉल (सदाशिव पेठ) ‘ येथे सोमवारी सायंकाळी काव्य सप्ताह ला प्रारंभ झाला.
‘कोवळ्या उन्हात, मोकळ्या रानात’ हे कवी संमेलन पहिल्या दिवशी पार पडले.डॉ. गौरी दामले, आनंद कुलकर्णी, दीपाली दातार, शिवाजी बोराडे, विजय सातपुते तसेच अनेक कवींनी कविता सादर केल्या. ३१ तारखेपर्यंत हा काव्यसप्ताह रोज सायंकाळी साजरा होणार आहे.