मालेगाव-
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या बाबतीत खूप काही झालं. सिनेमा हे फक्त उदाहरण आहे. दिघे यांच्या जीवनामध्येही ज्या घटना घडलेल्या आहेत, त्याचा मी साक्षीदार आहे. मी योग्य वेळी नक्की बोलेन,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भर सभेत म्हणाले.ते मालेगावमध्ये संभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यावरही भाष्य केले आहे. दिघेंसोबत काय झाले ते योग्य वेळी नक्की सांगेन, असेही शिंदे म्हणाले.शिंदे यांनी यावेळी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटावर घणाघाती टीका केली. सध्या मुलाखती दिल्या जात आहेत. पण मी जेव्हा मुलाखत देईन देव्हा राज्यात आणि देशात भूकंप होईल असे शिंदे म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मालेगाव येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री दादा भुसे, आमदार सर्वश्री सुहास कांदे, खासदार हेमंत गोडसे, गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, बबनराव पाचपुते, श्रीमती मंजुळाताई गावित, लताताई सोनवणे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे मुखपत्र सामना या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीवरही टीका केली. “मी आज जाहीरपणे काही गोष्टी बोलणार नाही. पण योग्य वेळी बोलेन. सध्या मुलाखतींचा सपाटा सुरु आहे. पण मी जेव्हा मुलखत देऊन तेव्हा राज्यात नव्हे तर देशात मोठा भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही. आरोप प्रत्यारोप करणे माझ्या स्वभावात नाही,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी टिका केली. यावेळी त्यांनी एक मोठे विधान केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे आणि माझ्यात काही गोष्टी आहेत. त्या मी ते बोलतील तसं तसं समोर आणेल. त्यातील अनेक मुद्दे उघड करीन. धर्मवीर आनंद दिघे यांचा आम्ही केवळ चित्रपट काढत काय काय काम केले हे दाखवले आहेत. पण त्यांच्या सोबत काय काय झाले हे आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. वेळ आली की ते सगळं मी सांगेल.