कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगलीतील काही गावांवर दावा सांगितला. त्यानंतर महाराष्ट्रातील मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई आज ( ६ नोव्हेंबर ) बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. पण, कर्नाटक सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे हा दौरा रद्द केल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली. तर दुसरीकडे कर्नाटकात महाराष्ट्रातील गाड्यांवर आज हल्ले करण्यात आले आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संतप्त सवाल केले आहेत , स्वतःला मुख्यमंत्रीपद हवे म्हणून सुरत तेथून गुवाहाटीला पळाले.. आता महाराष्ट्राची गावे , आणि गाड्या यावर कर्नाटक दादागिरी करते आहे आता का बेळगावी जात नाही ? असा सवाल त्यांनी केला आहे.
आदित्य ठाकरेंनी ट्वीट केलं आहे. त्यात म्हटलं की, “एका बाजूला शेतकरी त्रस्त आहेत. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. उद्योग महाराष्ट्रातून एका राज्यात पाठवलेत. आता आपल्या महाराष्ट्राची गावं दुसऱ्या राज्यात पळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण, घटनाबाह्य मुख्यमंत्री मात्र ह्या सगळ्यावर गप्प का? कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या दमदाटीला घाबरून महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारचे मंत्री तंतरले आणि दौरा स्थगित करून बसले. ही अखंड महाराष्ट्रासाठी शरमेची, दुःखाची गोष्ट आहे.”
“महाराष्ट्रधर्माशी केलेली गद्दारी आहे! स्वतःसाठी दुसऱ्या राज्यात पळून गेले, पण महाराष्ट्रासाठी बेळगावला जात नाहीत? राग ह्या गोष्टीचा येतो की, खरंतर जो विषय चर्चेचा नाही त्यावर चर्चा करायला निघाले होते, पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम देताच आपले मंत्री घाबरून तिथे गेलेच नाहीत. एवढं हतबल सरकार महाराष्ट्रात कधीच नव्हतं!,” असेही आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितलं आहे.