पुणे- पवार साहेबांबद्दल मला चुकीचे बोलायचे नव्हते,त्यांच्याबद्दल जेव्हा आदर व्यक्त केला तेव्हा नाही बाईट दिला आणि तुम्ही मोदीवर अमित शहावर बोललेले चालते. देवेंद्र फडणवीस यांना टरबूज्या म्हणतात ते चालते, मला चंपा म्हणतात ते चालते. मी कुठल्याही ट्रोलिंगला घाबरत नाही. असे सांगत आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आ. चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्यावर पवारांच्या विधानावरून टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले .
ते म्हणाले,’ सत्ताधारी पक्षातील ओबीसी नेत्यांकडून भीती निर्माण केली जाते आहे. मी कालच्या ओबीसी मेळाव्यात यासंदर्भात बोलताना मला कुणाचा अनादर करायचा नव्हता. पण तुम्ही मोदीबद्दल आणि माझ्याबद्दल बोलतात ते चालतं का ? उद्धव ठाकरे बद्दल पण बोलतो. त्याबद्दल कधी शिवसेना कधी काय बोलत नाहीत, राजकारण म्हटलं कि अस बोललं जाते. मी माझी बाजू मांडली, माझ्या दृष्टीने हा विषय संपला, त्यांना यावर बोलायचं असेल तर बोलत राहू दे!
ज्यांचा झेंडा एक नाही, ज्यांचे विचार एक नाहीत ते मांडीला मांडी लावून बसले आहेत.
महाराष्ट्राच्या इतिहासात असे पहिल्यांदाच होत आहे. तसेच अजित पवार महाराष्ट्राच्या प्रश्नावर कधी बोलत नाहीत आणि यावर बोलायला त्यांना वेळ कसा मिळाला. या सरकारमध्ये प्रचंड गोंधळ आहे, शाळांच्या बाबतीत एकमुखाने निर्णय होत नाही. मुलांच्या मनाशी हे सरकार खेळत आहे. यावर काही बोलले तर ट्रोल करण्यासाठी त्यांची पेड टीम तयार आहे. ट्रोलला आम्ही घाबरत नाही.
राज ठाकरे हे चांगले नेते आहेत , जनसामान्यांच्या प्रश्नांवर तळमळीने रियाक्ट होतात. मात्र परप्रांतीयाबाबतचे धोरण त्यांचे ठीक नाही. ते त्यांनी बदलायला हवे .८० टक्के मराठी माणसाला नोकरी मिळालीच पाहिजे या धोरणाशी आम्ही सहमत आहोत .मात्र परप्रांतीयाबाबतचे , त्यांनी इथे व्यवसाय देखील करू नये अशा पद्धतीचे धोरण बदलल्याशिवाय त्यांना यश मिळणार नाही. असे धोरण बदलल्याशिवाय त्यांच्यासोबत भाजपची युती होऊ शकत नाही. असेही आ. पाटील म्हणाले.