पुणे- लोकांच्या पैशावरील हक्क स्वतः कडे घेवून प्रकल्प चालविण्यास येणाऱ्या एसपीव्ही नावाच्या कंपनी राज ने आतापर्यंत या शहराला , लोकांना कोणते दिवास्वप्ने दाखविली आणि प्रत्यक्षात दिले काय ? असा सवाल करीत कॉंग्रेस चे नगरसेवक अविनाश बागवे यांनी मुळा मुठा नदी संवर्धनासाठी एसपीव्ही कंपनी स्थापन करण्यास कडाडून विरोध केला .नद्यांचे पावित्र्य राखले जावे, त्यांचे सुशोभीकरण व्हावे हि आपली भूमिका आहे पण हे काम जर लोकांच्याच पैशातून होणार आहे तर मग अधिकारशाही राबविणारे कंपनीराज का आणता ?सामान्य लोकांचे आणि त्यांच्या सामान्य प्रतिनिधींचे हक्क डावलून आणलेल्या एसपी व्ही ने आज वर काय दिले ? 3 वर्षासाठी पीएमपीएमएल एसपीव्ही ला प्रायोगित तत्वावर देण्यात आली होती ..आता पीएमपीएमएल च्या सेवेत काही फरक पडला नाही ,ती बरखास्त करा पुन्हा पीएमटी आणि पीसीएम टी वेगवेगळे करा असे सांगूनही तिथे एसपीव्ही तळ ठोकून आहे . स्मार्ट सिटी एसपीव्ही मार्फत राबविली जाते आहे .. त्यातूनही अजून काही निष्पन्न होऊ शकलेले नाही . मग २६१९ कोटीचा हा एवढा मोठा शहरावर दूरगामी परिणाम करणारा प्रकल्पासाठी एसपीव्ही कशाला आणता ? महापालिकेने तो स्वतः राबवावा . असेही बागवे यांनी म्हटले आहे … पहा आणि ऐका काल महापालिकेच्या मुख्य सभेत एसपीव्ही कंपनी करताना कॉंग्रेसच्या अविनाश बागवे यांनी नेमके काय म्हटले आहे .
लोकांच्या पैशावर बाबूगिरी करणाऱ्या एसपीव्ही ने आजपर्यंत दिले काय ?
Date: