नवी दिल्ली- भारतातील राजकीय आणि प्रशासकीय आणि अखेरीस नागरी बेपर्वाई मुळे भारतात कोरोनाने उच्छाद मांडला असून पहिल्या लाटे नंतर शहाणे होण्याऐवजी दुसऱ्या लाटेची कल्पना असून त्यात सहजपणे झोकून देण्यात आल्याचं म्हटले जाते आहे. गेल्या वर्षी १८ जून रोजी ११ हजार रुग्ण आढळून आले होते आणि ६० दिवसांत सरासरी दररोज ३५ हजार रुग्ण आढळून येत होते. १० फेब्रुवारीला दुसरी लाट सुरू झाल्यानंतर दररोज ११ हजार रुग्णसंख्या होती. ६ एप्रिलला देशात १ लाख रुग्ण आढळत आणि आता केवळ १५ दिवसांत नव्या रुग्णसंख्येत ३ लाखांचा विक्रम घडू लागलाय. जगात ही संख्या सर्वाधिक आहे. आतापर्यंत देशात अधिकृतपणे कोरोनामुळे १.८४ लाख मृत्यू झाले.
दुसऱ्या लाटेत कोरोनाचा वेग प्रचंड वाढला. दिल्ली, मुंबई, अहमदाबादमध्ये रुग्णशय्या व आयसीयू शिल्लक राहिलेले नाहीत, अशी स्थिती आहे. भारतात काेविड-१९ ची नवी रूपे तांडव घेऊन आले आहे. बी. १.६१७ नावाच्या या नव्या विषाणूत असामान्य म्युटेशन ई ४८४ क्यू व एल ४२५ आर आहे. त्याला डबल म्युटेंट व्हेरिएंट म्हटले जात आहे. तो वेगाने बाधित करू लागला आहे. परंतु कोरोनाविरोधात मिळालेल्या वेळेचा भारताने अपव्यय केला. म्हणूनच कोरोनाने महाप्रलयाचे रूप धारण केले, असे संशोधकांना वाटते.
प्रचारसभांचे आयोजन विज्ञानाशी सुसंगत कसे असू शकते?
विज्ञानाच्या म्हणण्यानुसार लोकांची गर्दी होण्यापासून रोखावे. मग हजारो लोकांना जाहीर सभांतून एकत्रित का येऊ दिले गेले? म्हणूनच अशा स्थितीत सभांचे आयोजन विज्ञानदृष्ट्या तर्कसंगत कसे का? -डॉ. शाहिद जमील, त्रिवेदी स्कूल ऑफ बॉयोसायन्सचे संचालक, अशोका युनिव्हर्सिटी
अयोग्य अधिकाऱ्यांचा हेका, अतिराष्ट्रवादातून संकट
भारतात नेहमीच अयोग्य अधिकाऱ्यांचा हेका दिसून येतो. जनतेत अतिराष्ट्रवाद व येथील राजकीय नेत्यांच्या लोकानुनयातून आजचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. ही शक्यता नेहमीच वाटायची. परंतु ते हाताळण्याची तयारी मात्र कधी केली नाही. – मिहिर शर्मा, ब्लूमबर्गचे स्तंभलेखक.
भारताने ब्राझील-ब्रिटनच्या लाटेवरून शिकायला हवे होते
भारताने ब्राझील व ब्रिटनमधील दुसऱ्या व तिसऱ्या लाटेवरून काहीही धडा घेतला नाही. काहीही तयारी केली नाही. आधी दक्षता बाळगणारे लोक दुसऱ्या लाटेत बेपर्वा झाले. हे सुपरस्प्रेडर बनले. -भ्रमर मुखर्जी, बायोस्टॅटिस्टियन, एपिडेमिअोलॉजी, मिशिगन युनिव्हर्सिटी