पुणे-
महाराष्ट्राचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष रमेश बागवे व ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार यांच्या हस्ते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास काँग्रेस भवन येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते उल्हास पवार म्हणाले की, ‘‘महाराष्ट्राचे भाग्यविधाते स्व. यशवंतरावजी चव्हाण यांनी आपल्या संघटनात्मक कौशल्याने काँग्रेस पक्षाचे व देशाचे नाव आतंरराष्ट्रीय पातळीवर पोहचवले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी औद्योगिक विकास केला व शेतीपूरक निर्णय घेतले. पुण्यात त्यांनी अनेक उद्योगपतींना आपले कारखाने स्थापन करण्यास सांगितले. त्यामुळे भारत फोर्ज बी.जी. शिर्के व पिंपरी चिंचवडमध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपले कारखाने स्थापन करून स्थानिक लोकांना रोजगार दिले. १९६९ च्या अखिल भारतीय काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनामध्ये ते म्हणाले की, मी मावळत्या सूर्याला नमस्कार करून सांगू इच्छितो की, महाराष्ट्र हा विचारांची पूजा असलेले राज्य आहे. त्यांच्या पुरोगामी विचारांमुळे महाराष्ट्राची आणि देशाची प्रगती झाली. केंद्रात त्यांनी उपपंतप्रधान, गृह, अर्थ व संरक्षण खाते सांभाळले. १९६५ ला पाकिस्तान विरूध्द भारताचे युध्द झाले त्यावेळी त्यांनी सीमेवर जाऊन जवानांना भेटून त्यांचे मनोधैर्य वाढविले. अशा या थोर स्वातंत्र्य सेनानीस त्यांच्या पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन.’’
यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचीही भाषणे झाली.
यावेळी कमल व्यवहारे, ॲड. अभय छाजेड, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, गोपाळ तिवारी, सोनाली मारणे, जयंत किराड, बाळासाहेब अमराळे, प्रकाश पवार, प्रविण करपे, अनुप बेगी, सुरेश कांबळे, गोरख पळसकर, योगेश भोकरे, गणेश शेडगे, सेल्वराज ॲन्थोनी, विठ्ठल गायकवाड, कान्होजी जेधे, राधिका मखामले, कल्पना उनवणे, शारदा वीर, ज्योती परदेशी, अविनाश अडसूळ, दिलीप लोळगे, ॲड.सुरेश बोराटे, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.