केंद्राने बघ्याची भूमिका घेऊ नये
मुंबई-महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांवर हल्ले येत्या चोवीस तासात थांबले नाही तर त्या संयमाला वेगळी किनार मिळेल व त्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि कर्नाटक सरकार त्यासाठी जबाबदार राहतील अशी शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करून बेळगावला जाणार असल्याचे सुतोवाच करत थेट पवारांनी कर्नाटक सरकारला अल्टीमेटम दिला आहे.शरद पवारांनी आज महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादावर पत्रकार परिषद घेतली. मुंबईत आज ते बोलत होते.पवार म्हणाले, कर्नाटक – महाराष्ट्र सीमावादावार आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही अशी भाषा असो की, सीमावादावर भाष्य असो की, जतच्या ग्रामस्थांना केलेले आवाहन असो कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावादावर केलेल्या भाषेवर आता भूमिका घेण्याची गरज आहे.शरद पवार म्हणाले, माझ्याकडे जी माहिती आहे ती चिंताजनक आहे. आज मला महाराष्ट्र एकीकरण समितीकडून जे काॅल येत आहेत ते चिंता व्यक्त करणारे आहे. एकीकरण समितीच्या कार्यालयासमोर पोलिस तैनात आहेत. समितीला निवेदन देण्यापासून मज्जाव केला जात आहे. मराठी लोकांवर बेळगावात दहशतीचे वातावरण आहे. कर्नाटकात 19 डिसेंबरला अधिवेशन असून त्यापूर्वी दहशत मराठी माणसांवर दडपशाही केली जात आहे.शरद पवार म्हणाले, तुम्ही कुणीतरी आम्हाला येऊन धीर द्यावा असे पत्र एकीकरण समितीचे आहे. या भागातील लोकांची महाराष्ट्रात सामिल होण्याची तयारी आणि इच्छा आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फडणवीसांनी केलेला काॅल उपयोग झाला नाही.शरद पवार म्हणाले, आज महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांवर जे हल्ले झाले, त्यामुळे भितीचे वातावरण आहे. महाराष्ट्राच्या संयम बाळगत आहे अजूनही बाळगेल. परंतु संयमालाही मर्यादा असतात. येत्या चोवीस तासात महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांवरील हल्ले थांबले नाही तर त्या संयमाला वेगळी किनार मिळेल व त्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि कर्नाटक सरकार त्यासाठी जबाबदार राहील.शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेची भूमिका अजूनही संयमाची आहे. पण कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याकडून चिथावणीखोर वक्तव्य येत आहे. त्यांच्या सहकाऱ्यांकडून हल्ले होत असतील तर हे देशाच्या ऐक्याला फार मोठा धक्का आहे. हेच काम जर कर्नाटकातून होत असेल तर केंद्र सरकारला बघ्याची भूमिका घेता येणार नाही.शरद पवार म्हणाले, उद्यापासून संसदेत सेशन सुरू होत आहे. महाराष्ट्रातील खासदारांना सांगितले की, कर्नाटकाबाबत गृहमंत्र्यांना प्रत्यक्ष परिस्थिती सांगा असे मी त्यांना सांगितले. त्यांचे प्रयत्न यशस्वी होत नसेल आणि कायदा जर हातात घेतला जात असेल तर त्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारची असेल.शरद पवार म्हणाले, सीमावादावर आम्ही संवेदनशील आहोत. महाराष्ट्राची भूमिका एका पक्षाची नाही. यावर सर्व पक्ष एकत्र आले आहेत. तेव्हा बैठका घेत न्यायालयीन लढण्याचे निर्णय घेतला आज ती लढाई न्यायालयात आहे. आपापली भूमिका मांडण्याची दोन्ही राज्यांना समान संधी आहे. परंतु, कर्नाटक सरकारकडून कायद्याचे उल्लंघन केले जात आहे.