अगोदर कोरोना नंतर ओबीसी आरक्षण अन पावसाळा आणि आता राजकारण …
१४ महापालिका , २७ जिल्हा परिषदा ,३५० नगरपालीकात प्रशासक राज ….
सरकार आणि निवडणूक आयोग दोहोंच्या विरोधात न्यायालयाचे ठोठावले दरवाजे …
पुणे : शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. सुदृढ लोकशाहीसाठी आवश्यक असलेल्या निवडणुका टाळून ,प्रशासक राजवटी लादून, न्यायालयाच्या आदेशांचे आणि काय्ध]याचे उल्लंघन करून लोकशाहीला हद्दपार करण्याचा हा एक प्रयत्न आहे असा आरोप करत काल एक याचिका दाखल करून आज एक रिट दाखल करत असल्याचे जगताप यांनी येथे सांगितले आहे.
पंधरा दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करा तसे न केल्यास आपण कोर्टाचा अवमान केला आहे असे मानले जाईल असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिल्यानंतरही शिंदे-फडणवीस सरकारने महानगरपालिका निवडणुका पुढे ढकलल्या असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
निवडणुका वेळेत घ्याव्यात अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.
प्रशांत जगताप यांनी सांगितले की, महानगरपालिकेच्या निवडणुका या वेळेत घ्याव्यात या मागणीसाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेच्यावतीने आम्ही काल राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाविरोधात याचिका दाखल केली आहे. आज आणखी एक याचिका आम्ही न्यायालयात दाखल करणार आहोत. मागच्या पाच महिन्यांपासून पुणे मनपासहित राज्यातल्या १४ महापालिका, २७ जिल्हापरिषदा, ३५० पंचायत समित्या आणि ३५० नगरपालिकेत प्रशासक नेमण्यात आला आहे. गेल्या महिन्यात ओबीसी आरक्षणाच्या निकालावेळी १५ दिवसांत निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्या आदेशाचे उल्लंघन करत या निवडणुका आणखी सात महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. हा सर्वोच न्यायालयाचा अवमान आहे, त्यामुळे आम्ही ही याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलल्याने नागरिकांना याचा त्रास होतो आहे. अनेकांना पाणी, स्वच्छता यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. असेही प्रशांत जगताप म्हणाले.