पुणे -चिंचवड आणि कसबा निवडणूक बिनविरोध होण्याचे काही कारण नाही. त्यांनी पंढरपूर, कोल्हापूर आणि देगलूरची निवडणूक बिनविरोध होऊ दिली नव्हती. एक मुंबईच्या बाबतीत त्यांनी बिनविरोध करण्याबाबत निर्णय घेतला म्हणजे बाकीच्या निवडणुका बिनविरोध होतील हे त्यांनी डोक्यातून काढावे. लोकशाही आहे त्यामुळे जनतेला ज्यांना मतदान द्यायचे त्यांना देतील अशी स्पष्ट भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपला आज दिला. ते पुण्यात आज माध्यमांशी बोलत होते.
पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील बिनविरोध होणार नाहीत, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपकडून बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तरी मुंबई वगळता कुठलीही निवडणूक बिनविरोध झालेली नाही त्यामुळे या दोन्ही जागेवर निवडणूक होणारच.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर देखील अजित पवार यांनी भाष्य केले. ‘राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबच चालल्या आहेत. निवडणुका आणखी लांबू शकतात. मात्र निवडणुका कधी घ्यायचा हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, असे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सांगितले.