या चर्चासत्रामध्ये कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर, विद्याधर अनास्कर आणि प्रा. एच. एम. देसरडा हे मान्यवर सहभागी झाले होते.
‘भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी हजार व पाचशेचे चलन बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला परंतु नियोजनशून्य व्यवस्थेमुळे सामान्य नागरिक, महिला, छोटा व्यावसायिक, शेतकरी यांची गैरसोय होत आहे . सामन्यांना हजार दोन हजार रुपयांसाठी रांगेत उभे राहावे लागत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला. नोटबंदीने सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात अश्रू आणले . गरीब आणि सर्वसामान्य जनता यात भरडली जात आहे. धनदांडग्यांकडे लाखो रुपयांच्या नव्या नोटा सापडत आहेत. भ्रष्टाचार थांबण्यापेक्षा अधिक बोकळण्याची शक्यता आहे . नोटबंदी ऐवजी एकवेळ दारूबंदी केली असती तर लोकांनी सहन केले असते .५० दिवसांच्या आश्वासनानंतरही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही’, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ञ एच. एम. देसरडा यांनी व्यक्त केले .
यावेळी ‘बड्या घोषणा पोकळ दावे,अर्थव्यवस्थेचे वाजले दिवाळे’! या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कांढण्यात आलेल्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले .
यावेळी अंकुश काकडे , ऍड .म.वि. अकोलकर , रवींद्र माळवदकर अशोक राठी पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते .
खासदार ,शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी या चर्चासत्राबाबत माहिती देताना सांगितले ,’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी अचानकपणे ५०० व १००० च्या नोटा चलनातून रद्द केल्या. देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी काळापैसा नष्ट केला जात असेल, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निर्णयाचे स्वागत केले. परंतु दुर्देवाने या निर्णयामुळे निर्माण होणार्या परिस्थितीची कोणतीही पूर्वतयारी न करता अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत देशातील करोडो नागरिकांना प्रचंड आर्थिक तणावाला सामोरे जावे लागले. देशातील कृषी व्यवस्था मोडकळीस आली, कष्टकरी आणि असंघटीत कामागारांवर बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आली. शेतमालाचे भाव कोसळले, छोट्या व्यावसायिकांचे धंदे बंद पडले तर मोठ्या उद्योगांवर कामगार कपातीची वेळ आली. सामान्य माणसाकडेच काळा पैसा साठला आहे, या अविर्भावात केंद्र सरकारने त्यांना रांगेत उभे करून हैराण केले. देशामध्ये आर्थिक आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण झाली. या विरोधात बोलणार्यांना देशद्रोही ठरविण्यात आले. या पार्श्वभूमीवर हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते’.