नागरिकांचा माहितीचा अधिकारच काढून टाकण्याचे प्रयत्न, राजपत्रातील बेकायदेशीर तरतुदी रद्द करा – हर्षवर्धन सपकाळ.

Date:

मुंबई, दि. २० जून २०२६.

सरकारी कारभारात पारदर्शकता असावी आणि त्याचे उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी काँग्रेसप्रणित युपीए सरकारने जनतेला ऐतिहासिक असा माहिती अधिकार कायद्याचा अत्यंत महत्त्वाचा अधिकार दिला आहे, पण सध्याच्या सरकारने मात्र नागरिकांना माहितीपासून दूर ठेवण्यासाठी अडथळ्यांची भिंत उभी केली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात गंभीर कायदेशीर त्रुटी व मूळ कायद्याशी विसंगत तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांचा माहितीचा अधिकारच काढून टाकण्याचा प्रयत्न केलेला असून यामुळे शासनाच्या पारदर्शकतेच्या तत्त्वालाही धक्का पोहोचत आहे. सरकारने तातडीने या बेकायदेशीर तरतुदी रद्द कराव्यात, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

राज्याचे मुख्य सचिव यांना यासंदर्भात पाठवलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणतात की, सामान्य प्रशासन विभागाने दिनांक १२ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मध्ये बेकायदेशीर तरतुदी रद्द केल्या आहेत. माहिती अधिकार अर्ज, प्रथम अपील, द्वितीय अपील तसेच माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. या शुल्कवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना माहितीचा अधिकार वापरणे आर्थिकदृष्ट्या कठीण होईल आणि माहितीचा अधिकार अधिनियमाचा मूलभूत उद्देशच बाधित होईल.केंद्र सरकार आजही माहिती अधिकारासाठी केवळ १० रूपये आकारते आणि अपिलसाठी कोणतेही शुल्क आकारत नाही. असे असताना राज्य सरकार जनतेकडून पैसे वसुलीची भूमिका का घेत आहे? माहितीचा अधिकार अधिनियमातील कलम ४(१)(क) व ४(१)(ड) नुसार जनतेवर परिणाम करणारा कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना त्यामागील कारणे, वस्तुस्थिती, विचारप्रक्रिया व संबंधित माहिती स्वतःहून प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. तथापि, शुल्कवाढीचा निर्णय घेताना त्यामागील कोणतीही कारणमीमांसा, अभ्यास, आर्थिक विश्लेषण अथवा वस्तुनिष्ठ माहिती यात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.

विशेष म्हणजे, त्याच राजपत्रातील कलम ११(ग) मध्ये अनिवार्य माहिती स्वतःहून प्रसिद्ध करण्यात कसूर झाल्यास ती कर्तव्यच्युती मानून संबंधित कार्यालय प्रमुखावर सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याची स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे.त्यामुळे, स्वतःच घालून दिलेल्या तरतुदींचे पालन करण्यात झालेल्या कसुरीबद्दल सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांच्यावर कलम ११(ग) नुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी.राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहिती अधिकार अर्जाच्या नमुन्यामध्ये अर्जदारास माहिती मागण्याचे “प्रयोजन” नमूद करण्याची सक्ती करण्यात आली आहे. ही अट माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम ६(२) शी स्पष्टपणे विसंगत आहे. माहिती अधिकार कायद्यातील सदर कलमानुसार माहिती मागणाऱ्या व्यक्तीस माहिती का हवी आहे, याचे कारण देणे आवश्यक नाही. त्यामुळे राजपत्राद्वारे संसदेने मंजूर केलेल्या मूळ कायद्याच्या तरतुदींचा अवमान करण्यात आला आहे.

या पत्रात सपकाळ पुढे म्हणतात की, दिनांक १२ जून २०२६ च्या राजपत्रातील बेकायदेशीर व कायद्याशी विसंगत तरतुदी तात्काळ रद्द करा. माहितीचा अधिकार अधिनियमाच्या कलम ४ चे उल्लंघन केल्याबद्दल तसेच राजपत्रातील कलम ११(ग) नुसार सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करावी.माहिती अधिकार अर्जाच्या नमुन्यातील “प्रयोजन” नमूद करण्याची अट तात्काळ रद्द करून त्याबाबत शुद्धीपत्रक (Corrigendum) प्रसिद्ध करण्यात यावे. शुल्कवाढीमागील कारणे, अभ्यास अहवाल, आर्थिक विश्लेषण व इतर सर्व संबंधित माहिती माहितीचा अधिकार अधिनियमाच्या कलम ४ नुसार स्वतःहून सार्वजनिक करण्यात यावी. यापूर्वी राज्य सरकारने विविध विभागांना स्वतःहून माहिती अधिकारांतर्गत माहिती जाहीर करण्याचे आदेश अनेकदा दिले आहेत. तरीही अशी माहिती जाहीर न करणा-या किती विभाग प्रमुखांवर आपल्यातर्फे आजवर कारवाई करण्यात आली, याची माहितीही देण्यात यावी.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

परभणीतील यशवाडीत हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला; 7 भाविकांचा मृत्यू

परभणी-परभणीच्या मानवत तालुक्यातील प्रसिद्ध यशवाडी देवस्थान येथे शनिवारच्या गर्दीत...

माणवत मर्डर्स’ – उलगडणार एक थरारक रहस्य!

२२ जूनपासून रात्री १०.१५ वाजता सोनी मराठीवर! कौटुंबिक भावना, नात्यांची...

पुण्यात 500 मुलांसोबत पार पडले स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकारातून योगसत्र

विद लव्ह एनजीओ आणि एपिफनी स्कूलसोबत 500 मुलांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन पुणे,: आरोग्य आणि समावेशकतेचा संदेश देत विद लव्ह एनजीओने एपिफनी स्कूलच्या सहकार्याने 19 जून रोजी वंचित समुदायातील 500 मुलांसाठी विशेष आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन केले. योग मॅट्स नसतानाही मुलांनी चादरी आणि टॉवेल्स अंथरून संपूर्ण उत्साहाने आणि मनापासून योग केला. यामुळे एक महत्त्वाचा संदेश मिळाला की योगासाठी साधनांपेक्षा इच्छाशक्ती, सहभाग आणि सकारात्मक मनोवृत्ती अधिक महत्त्वाची असते. या कार्यक्रमात मुलांनी उत्साहाने योगासने, प्राणायाम, ध्यान आणि बजाज प्लँकथॉनपासून प्रेरित #100SecondsPlankTogether या उपक्रमात सहभाग घेतला. "500 Children. One Breath. One Future." या संकल्पनेखाली आयोजित या उपक्रमाचा उद्देश प्रत्येक मुलाला आरोग्य, आत्मविश्वास आणि आशा मिळण्याचा समान हक्क आहे, हा संदेश देणे हा होता. विद लव्ह एनजीओच्या संस्थापक डिंपल सोमजी म्हणाल्या, "आजचा दिवस केवळ योगाचा नव्हता, तर तो आपलेपणाचा उत्सव होता. 500 मुलांना एकत्र योग करताना, हसताना आणि सहभागी होताना पाहणे म्हणजे प्रत्येक मुलाला त्याच्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक विकासासाठी संधी मिळायला हवी, याची पुन्हा एकदा जाणीव करून देणारा क्षण होता." एपिफनी स्कूलच्या मुख्याध्यापिका संगीता कदम म्हणाल्या, "असे कार्यक्रम केवळ तंदुरुस्तीपुरते मर्यादित नसून मुलांसाठी सुंदर आठवणी निर्माण करतात, चांगल्या सवयी रुजवतात आणि त्यांना विशेष व महत्त्वाचे असल्याची जाणीव करून देतात." या कार्यक्रमाने एपिफनी स्कूलमधील अनेक मुलांच्या शैक्षणिक गरजांकडेही लक्ष वेधले. ही मुलं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून येतात. अनेकांच्या कुटुंबांवर गरीबी, गुन्हेगारी, मद्यपान आणि कठीण जीवनस्थितीची छाया आहे. काही मुलांचे संगोपन एकल पालक करत असून ते रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आयोजकांनी व्यक्ती, कुटुंबे, संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्राला शालेय फी, गणवेश, वह्या, शालेय साहित्य आणि इतर आवश्यक गोष्टींसाठी पुढे येऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाचा समारोप अल्पोपहार, पुस्तकं आणि क्रीडा साहित्य वाटप तसेच प्रत्येक मुलाला शिकण्याची, वाढण्याची आणि प्रगती करण्याची संधी मिळावी, या सामूहिक संकल्पाने झाला. विद लव्ह एनजीओ विषयी:  विद लव्ह एनजीओ ही पुणेस्थित स्वयंसेवी संस्था असून शिक्षण, आरोग्य, स्वयंसेवा आणि प्रेमळ कृतींच्या माध्यमातून मुलं आणि समुदायांसाठी अर्थपूर्ण संधी निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१००० सूर्यनमस्कारचे उदिष्ट पूर्ण – धीरज घाटे

पुणे :-अंतराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्त भारतीय जनता पार्टी पुणे...