..अखेर शरद पवार म्हणाले ,नरेंद्र मोदींना पुरस्कार मला आनंद ,अभिनंदन करतो

Date:

पुणे- जे होऊ नये असे अनेक विरोधी पक्षांना वाटत होते अखेर तेच झाले ,टिळक पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांच्या यादीत नरेंद्र मोदींचाहि सामावेश झाला याचा मला आनंद आहे मी त्यांचे अभिनंदन करतो अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्काराने सानाम्नीत करण्याच्या सोहळ्याचे समर्थन केले . एकीकडे पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत असताना पवार मात्र व्यासपीठावर मोदी यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसून आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून शरद पवार यांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी केली. या पुरस्कार मिळालेल्यांच्या यादीत इंदिरा गांधी होत्या, खान अब्दुल गफार, बाळासाहेब देवरस होते, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह होते अशी अनेकांची नावं घेता येतील. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश झाला याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आणि देशाला आहे. त्यामुळे मी सगळ्यांच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी टिळक पुरस्कारासाठी जी निवड झाली त्याबद्दल मी त्यांचं अंतःकरणापासून अभिनंदन करतो असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

पवार यावेळी म्हणाले,’देशात पुण्याचे एक वेगळे महत्त्व आहे. शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला असून लाल महालामध्ये त्यांचे बालपण गेले. याच जिल्ह्यातून त्यांनी स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली. अनेक राजाचे संस्थान त्यांच्या नावाने ओळखले जात असताना शिवरायाचे कार्य वेगळे आहे. त्यांचे राज्य भोसल्याचे राज्य नव्हते, तर ते हिंदवी स्वराज्य रयतेचे राज्य होते, असे म्हणत शरद पवार यांनी महाराजांच्या कार्यांची महती सांगितली.

पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी शरद पवार यांचे भाषण झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर शरद पवार आणि नरेंद्र मोदी पहिल्यांदा एकाच व्यासपीठावर आले. विशेष म्हणजे सहकारी पक्षांचा विरोध पत्करून पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.

शरद पवार पुढे म्हणाले की, आपल्या देशाच्या जवानांनी देशासाठी सर्जिकल स्ट्राइक केला, ही चर्चा आता होत आहे. मात्र, शिवाजी महाराजांनी लाल महालामध्ये ताबा घेण्याचा प्रयत्न करत या देशातील पहिला सर्जिकल स्ट्राइक झाला हे आपण विसरू शकत नाही, असे त्यांनी म्हटले. तर हिंदवी स्वराज्याचा पाया शिवरायांनी रचला. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. लोकमान्यांनी स्वराजाचे आंदोलन केले. केसरी आणि मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजाचा घाम फोडला. टिळक आणि महात्मा गांधींचे योगदान आम्ही विसरु शकत नाही असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.शरद पवार पुढे म्हणाले की, पत्रकारितेवर कुणाचा दबाव असता कामा नये. त्या दबावातून पत्रकारिता मुक्त झाली पाहिजे,अशी भूमिका त्यांनी सातत्याने पाळली आहे. 1885 साली भारतीय काँग्रेसचा जन्म झाला, त्यावेळी प्लेगच्या साथामुळे येथे काँग्रेसचे अधिवेशन पुण्यात न होता मुंबईत झाले होते. यावेळी जहाल गटाचे नेतृत्व लोकमान्य टिळक करत होते. यावेळी त्यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे म्हणत शरद पवारांनी फटकेबाजी केली आहे.शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, टिळक पुरस्काराला एक आगळे वेगळे महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला पुरस्कार याआधी अनेक ज्येष्ठ मान्यवरांना मिळाले आहे. आता याच पंगतीमध्ये यादीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश झाला यांचा आपल्याला सर्वांना आनंदआहे असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन पवारांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...