पुणे- जे होऊ नये असे अनेक विरोधी पक्षांना वाटत होते अखेर तेच झाले ,टिळक पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांच्या यादीत नरेंद्र मोदींचाहि सामावेश झाला याचा मला आनंद आहे मी त्यांचे अभिनंदन करतो अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्काराने सानाम्नीत करण्याच्या सोहळ्याचे समर्थन केले . एकीकडे पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत असताना पवार मात्र व्यासपीठावर मोदी यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसून आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून शरद पवार यांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी केली. या पुरस्कार मिळालेल्यांच्या यादीत इंदिरा गांधी होत्या, खान अब्दुल गफार, बाळासाहेब देवरस होते, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह होते अशी अनेकांची नावं घेता येतील. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश झाला याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आणि देशाला आहे. त्यामुळे मी सगळ्यांच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी टिळक पुरस्कारासाठी जी निवड झाली त्याबद्दल मी त्यांचं अंतःकरणापासून अभिनंदन करतो असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
पवार यावेळी म्हणाले,’देशात पुण्याचे एक वेगळे महत्त्व आहे. शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला असून लाल महालामध्ये त्यांचे बालपण गेले. याच जिल्ह्यातून त्यांनी स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली. अनेक राजाचे संस्थान त्यांच्या नावाने ओळखले जात असताना शिवरायाचे कार्य वेगळे आहे. त्यांचे राज्य भोसल्याचे राज्य नव्हते, तर ते हिंदवी स्वराज्य रयतेचे राज्य होते, असे म्हणत शरद पवार यांनी महाराजांच्या कार्यांची महती सांगितली.
पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी शरद पवार यांचे भाषण झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर शरद पवार आणि नरेंद्र मोदी पहिल्यांदा एकाच व्यासपीठावर आले. विशेष म्हणजे सहकारी पक्षांचा विरोध पत्करून पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.
शरद पवार पुढे म्हणाले की, आपल्या देशाच्या जवानांनी देशासाठी सर्जिकल स्ट्राइक केला, ही चर्चा आता होत आहे. मात्र, शिवाजी महाराजांनी लाल महालामध्ये ताबा घेण्याचा प्रयत्न करत या देशातील पहिला सर्जिकल स्ट्राइक झाला हे आपण विसरू शकत नाही, असे त्यांनी म्हटले. तर हिंदवी स्वराज्याचा पाया शिवरायांनी रचला. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. लोकमान्यांनी स्वराजाचे आंदोलन केले. केसरी आणि मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजाचा घाम फोडला. टिळक आणि महात्मा गांधींचे योगदान आम्ही विसरु शकत नाही असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.शरद पवार पुढे म्हणाले की, पत्रकारितेवर कुणाचा दबाव असता कामा नये. त्या दबावातून पत्रकारिता मुक्त झाली पाहिजे,अशी भूमिका त्यांनी सातत्याने पाळली आहे. 1885 साली भारतीय काँग्रेसचा जन्म झाला, त्यावेळी प्लेगच्या साथामुळे येथे काँग्रेसचे अधिवेशन पुण्यात न होता मुंबईत झाले होते. यावेळी जहाल गटाचे नेतृत्व लोकमान्य टिळक करत होते. यावेळी त्यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे म्हणत शरद पवारांनी फटकेबाजी केली आहे.शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, टिळक पुरस्काराला एक आगळे वेगळे महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला पुरस्कार याआधी अनेक ज्येष्ठ मान्यवरांना मिळाले आहे. आता याच पंगतीमध्ये यादीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश झाला यांचा आपल्याला सर्वांना आनंदआहे असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन पवारांनी केले आहे.

