दक्षता घेऊनच ; अधिकृत कर्मचाऱ्याकडेच करा व्यवहार
पुणे- बँकेमध्ये कॅश भरण्यासाठी येणा-या ग्राहकांना बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवुन तसेच बँकेतील स्लिप भरण्यास मदत करण्याचा बहाणा करुन महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील इतर राज्यात फसवणुक करणा-या चोरास पुण्यातील लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. त्याने आजवर एकूण 50 लाख रुपये अशाच मार्गाने हडप केल्याचे निष्पन्न झाले आहे
याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या चौकशीमध्ये संबंधित चोरट्यांनी तब्बल 49 गुन्ह्यात 50 लाख रुपयांचा गंडा आतापर्यंत वेगवेगळ्या नागरिकांना घातल्याचे उघडकीस आल्याची माहिती परिमंडळ दोनच्यापोलिस उपयुक्त स्मार्तना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. चोरट्यांनी लुटमार केलेली रक्कम लॉटरीच्या व्यसनात घालवण्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
दीपककुमार ओमप्रकाश मेहंगी (वय- 47 ,राहणार- पानिपत, हरियाणा), सुनील रामप्रसाद वर्ग (वय -37 ,राहणार – पानिपत, हरियाणा )आणि सुरज कुमार ओम प्रकाश मेहंगी( वय – 39 ,राहणार – हरियाणा , पानिपत )अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत नितीन रामचंद्र पवार (वय 53, राहणार- उंड्री, पुणे) यांनी लष्करपोलिस ठाण्यात आरोपीं विरोधात तक्रार दाखल केलेली आहे .13 जून रोजी कॅम्प परिसरातील इंडसइंड बँकेत तक्रारदार नितीन पवार यांचे मॅनेजर हे चार चेक करण्यासाठी आले होते. त्यावेळी कॅशियरकडून तीन लाख रुपयांची रक्कम घेण्यात आली. त्यावेळी कॅश काऊंटर जवळ उभा असणारा आरोपी दीपक कुमार मेहंगी यांनी बँकेचाच माणूस असल्याचे भासवून बँकेतून काढलेल्या रकमेत रंग लागलेल्या पाचशे रुपये दराचे दोन बंडल घेऊन कॅशियार कडून बदलून देतो असे सांगितले. त्यानुसार आरोपी हा संबंधित बंडल मधील एक लाख रुपये घेऊन पसार झाला.
गुन्हयाची मोडस
मुख्य आरोपी हा बँकेत थांबुन पैसे भरण्यासाठी येणा-या ग्राहकास स्लिप भरण्यास मदत करतो तसेच त्यांचे सोबत कॅश काऊंटरवर जाऊन ग्राहकाची दिशाभुल करुन कॅशियर यास ग्राहकाचे सोबत असल्याचे भासवुन बँकेमध्ये कॅश भरण्यासाठी येणा-या ग्राहकांना बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवुन तसेच ग्राहक पैसे मोजत असताना काही नोटांचे बंडल खराब आहेत नोट बदलुन आणण्याचा बहाणा करुन ग्राहकांची फसवणुक केली आहे.
करण्यात आली असुन ०९ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळाली असुन आरोपीकडे पोलीस कस्टडीदम्यान तपास केला असता त्याने पुणे शहर, नाशिक, मध्यप्रदेश, गुजरात, मुंबई, कल्याण, शिर्डी, अहमदनगर, पनवेल, वाशी, अशा वेगवेगळया ठिकाणी १९ गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.