उपनगर वार्ताहरावर झालेल्या गोळीबाराचे गूढ उकलले, ६ जण पकडले, पोलीस म्हणाले सूत्रधारही लवकरच ताब्यात घेणार

Date:

पुणे- येथील उपनगर वार्ताहर हर्षद कटारिया यांच्यावरील हल्ला जमिनीच्या आर्थिक देवाणघेवाणीतून झाल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी याप्रकरणी ६ जणांना ताब्यात घेतले आहे यातील दोघांना अटक केली आहे .तर चार जण अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले . या हल्ल्यामागील सूत्रधाराची माहिती पोलिसांना प्राप्त झालेली असून लवकरच त्यास हि ताब्यात घेऊन त्याचा पर्दाफाश पोलीस करतील असे सांगण्यात आले आहे.

अटक केलेल्या आरोपींची नावे प्रथमेश उर्फ शंभू धनंजय तोंडे वय २० रा.११४ सी बिल्डींग पीएमसी कॉलनी ,राजेंद्रनगर आणि अभिषेक शिवाजी रोकडे वय २२ रा. जाधवरांच्या वाड्याशेजारी ,नांदेड गाव अशी आहेत .धायरी आणि नांदेड गावातूनच अन्य ४ अल्पवयीन आरोपीना देखील पोलसांनी ताब्यात घेतले आहे.परिमंडल २ च्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

दि. 24/05/2023 रोजी रात्री 19.00 वा. चे सुमारास कटारिया नावाचे उपनगर वार्ताहर ,ज्याचा जमिनी खरेदी विक्रीचाही व्यवसाय आहे हे त्यांचे दुचाकीवरून घरी जात असताना दोन दुचाकीवरुन आलेल्या 05 अज्ञात आरोपींनी त्यांचे दुचाकीला गाडी आडवी लावुन त्यांच्या अंगावर मिरची पावडर फेकुन कोयता घेवुन त्यांच्या अंगावर धावुन गेले असता कटारिया हे सदर ठिकाणाहून त्यांचा जीव वाचवुन पळुन गेले. त्यानंतर दि. 11/06/2023 रोजी रात्री 21.00 वा. चे सुमारास कटारिया यांचा पाठलाग करून त्यांच्या घराजवळ आले असता त्यांचेकडील पिस्तुलमधून एक राउंड फायर केला प्रांती कटारिया गाडीवरच खाली वाकल्याने ते त्यातुन वाचले व तेथुन ते सोसायटीचे आतमध्ये गाडी घेवुन गेले व त्यांचेवर झालेला प्राणघातक व जिवघेणा हल्ला झाल्याने पोलिसात तक्रार दाखल झाली होती .

या गुन्हयातील काही आरोपी हे तोंडाला रुमाल व मास्क घालुन तसेच काही आरोपी हे तोंड लपवत डोक्यावर टोपी परिधान करुन रात्रीच्या वेळी हल्ला करीत असल्याचे सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसुन आले परंतु त्यांची ओळख व गाडयांचे नंबर ओळखणे अतिशय जिकरीचे व अवघड झाले होते. आरोपी हे इंस्टाग्राम व व्हॉट्सअ‍ॅपचे कॉलींगद्वारे एकमेकांचे संपर्कात असल्याने त्याबाबत तात्रीक विश्लेषनामध्ये अडचण येत होती. स्वारगेट तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी जवळ जवळ 100 ते 120 सीसीटिव्ही फुटेज चेक केले परंतु काहीएक उपयुक्त माहिती मिळुन आली. नाही. स्वारगेट पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सलग 15 दिवस अहोरात्र चिकाटीने आरोपीचा शोध घेतला असता पो. अं. अनिस शेख, पो. अं. शिवदत्त गायकवाड, पो.अं. संदीप घुले, पो.अं. फिरोज शेख व पो.अं सोमनाथ कांबळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि या गुन्हयातील संशयित आरोपी रांजणगाव येथे जात आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी बातमीबाबत वरिष्ठांना माहिती दिली त्यानंतर तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे यांचे पथक व पोलीस उप निरीक्षक अशोक येवले यांचे पथक असे दोन पथके तयार करुन सहा.पोलीस निरीक्षक प्रशांत संदे यांचे पथक रांजणगावकडे रवाना केले तसेच पो. उप निरी येवले यांचे पथक धायरी भागात थांबुन होते. संशयित आरोपी हे पेरणेफाटा लोणीकंद याठिकाणी थांबले आहेत अशी बातमी मिळाल्याने पोलिसांनी बातमीचे ठिकाणी जावुन सापळा लावला असता त्या ठिकाणी आकाशी रंगाचा हाफ बाहयाचा टि शर्ट व काळया रंगाचा फुल बाहयाचा टि शर्ट घातलेले दोन इसम सदर ठिकाणी संशयीत रित्या फिरत असल्याचे दिसुन आले तसेच पोलिसांची चाहुल लागताच ते जोरात पळुन जात असताना पोलिसांनी त्यांचा शिताफीने पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. या आरोपींकडे दाखल गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्यांनी दाखल गुन्हा त्यांचे इतर साथीदारांसह मिळुन केला असल्याची कबुली दिल्याने त्यांचे इतर साथीदारांचा तपास पथकाचे अधिकारी सपोनि प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पो. हवा. तारु,पो.अं.दिपक खेदाड, सुजय पवार, प्रविण गोडसे व रमेश चव्हाण असे मिळुन धायरी, नांदेडगांव या परिसरामध्ये पहाटेचे सुमारास सापळा लावुन 04 संशयित आरोपींना ताब्यात घेतले असता ते अल्पवयीन असुन त्यांचा दाखल गुन्हयामध्ये सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींना अटक करुन त्यांचेकडुन तपासादरम्यान 01 गावठी पिस्टल, 01 जिवंत काडतुस 03 कोयते, गुन्हयात वापरलेल्या 04 दुचाकी गाडया व 03मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 25 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा गुन्हा हा जमिनीच्या आर्थिक व्यवहारातुन सुपारी घेवुन घडला असल्याचे प्रथमदर्शनी तपासावरुन निष्पन्न झाले आहे. आरोपी हे अभिलेखावरील आरोपी असुन ते सराईत व घातक हत्यारानीशी वावरत असल्याने त्यांना पकडणे धोकादायक होते तरी वरील स्टाफच्या मदतीने अतिशय सावधगीरीने व शिताफीने त्यांना जेलबंद करण्यात स्वारगेट तपास पथकाला यश आले आहे.असे स्मार्तना पाटील यांनी सांगितले.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक,अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील ,पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर , यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षकअशोक इंदलकर व प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे. पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, व पो.हवा मुकुंद तारु, पो.शि सोमनाथ कांबळे, शिवा गायकवाड, फिरोज शेख, रमेश चव्हाण, संदीप घुले, अनिस शेख, दिपक खेदाड, सुजय पवार, प्रविण गोडसे यांनी एकत्र मिळुन केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...