राहुल गांधी भारताचे PM झाले तर भ्रष्ट भाजप नेत्यांना तुरुंगात डांबणे सोपे होईल, ED कारवाईवर नाना पटोले आक्रमक

Date:

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात विक्रमी भ्रष्टाचार 75 रु. किलोची सुतळी 550 रुपयांना

मुंबई

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आदित्य ठाकरे यांच्या निटकवर्तीयांवर टाकलेल्या छापेमारीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणी केंद्र व सत्ताधारी भाजपवर निशाणा साधत सत्ता बदल झाल्यानंतर जशास तसे प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.देशात सूडाचे राजकारण सुरू आहे. देशात जे काही भ्रष्टाचारी लोक होते, ज्यांच्या ईडी व सीबीआय चौकशा सुरू होत्या, त्या सर्वांना भाजपने दबाव टाकून आपल्या पक्षात समाविष्ट करून घेतले. आता हे सर्वजण भाजपचे नेते म्हणून एकत्र आलेत. उद्या आमचे काँग्रेस नेते देशाचे पंतप्रधान झाले तर या सर्वांना तुरुंगात डांबणे आम्हाला सोपे होईल, असे नाना पटोले भाजपला इशारा देत म्हणाले.

आता निवडणुकांची वेळ जवळ येत आहे. त्यामुळे विरोधकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात काहीच नाविन्य नाही. विरोधी पक्ष तपास यंत्रणांच्या दबावाला भीक घालणार नाहीत. भाजपला सत्तेतून बेदखल करणे हाच विरोधी पक्षांचा एकमेव अजेंडा आहे. देश व संविधानाच्या संरक्षणासाठी भाजपला सत्तेतून पायऊतार करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असे नाना पटोले म्हणाले.

आगामी निवडणुकांत जनताच भाजपला घरी बसवेल, असा दावाही पटोलेंनी यावेळी केला. सरकार शेतमालाची खरेदी करते. त्याला सुतळी लागते. ती बाजारात अवघ्या 75 रुपयांना किलो मिळते. याऊलट सरकार हीच सुतळी 550 रुपये किलो दराने विकत घेते. या पद्धतीने हे सरकार कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करत आहे, असे पटोले म्हणाले. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या काळात विक्रमी भ्रष्टाचार झाल्याचा दावाही नाना पटोले यांनी यावेळी केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...