लोकसभेत साडेतीनशे पेक्षा जास्त जागा भाजपा मिळवेल- जावडेकर

Date:

आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला साडेतीनशे पेक्षा जास्त जागा तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) चारशे पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा खासदार, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. देशाला विकसित भारत करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली असून २०२४ च्या निवडणुकीनंतर विकासाची गती वाढेल, असेही त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत खासदार प्रकाश जावडेकर बोलत होते.,माजी आमदार आणि राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष प्रा. मेधा कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस, माजी महापौर मुरलीधर मोहोळ,शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

जावडेकर म्हणाले की,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात गेली नऊ वर्षे एका पक्षाचे पूर्ण बहुमत असलेले एनडीए सरकार आहे. त्यामुळे भारताला स्थिरता, विकास, गरीब कल्याण आणि जगात मानाचे स्थान मिळाले. लोकांचा नरेंद्र मोदींवरील विश्वास ही आमची मोठी ताकद आहे. 2024 साली लोकसभा निवडणुकीत 350 पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पक्षाला आणि एनडीए ला 400 पेक्षा अधिक जागा मिळतील असा आमचा ठाम विश्वास आहे. देशाला विकसीत भारत, होण्याच्या दृष्टीने मोठी वाटचाल झाली आहे व 2024 नंतर विकासाची गती आणखी वाढेल.

प्रधानमंत्री मोदी यांनी विकासाचे सकारात्मक राजकारण केले. विकासाचा लाभ देण्यात जात, धर्म, प्रांत, लिंग, मतदाराचा कल या कोणत्याही कारणावरून भेद केला नाही. जनतेनेही स्वच्छ भारत, डिजिटल भारत, नागरिकांनी मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, शाश्वत विकास, घर घर तिरंगा अशा अनेक योजनांमध्ये सहभाग घेतला. सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास-सबका प्रयास ह्या सूत्रावर मोठी प्रगती झाली.

मध्यमवर्गाला शांतता, सुबत्ता, सुलभ सुविधा आणि विकासाच्या विपुल संधी हव्या असतात. 2004 ते 2014 या कालखंडात विविध शहरात होणारे बॉम्बस्फोट संपले, माओवाद्यांचा प्रभाव 90 टक्के कमी झाला. जम्मु काश्मीर व पूर्वोत्तर राज्यात विकास व शांतता वाढली. 7 लाख उत्पन्नावर आता आयकर भरावा लागत नाही. रेरा, सेल्फ ॲटेस्टेशन, शासकीय सेवा ऑनलाईन, फेस लेस ॲसेसमेंट, ई रिटर्न फायलींग, 15 दिवसात रिफंड, मूलभूत सुविधांचा विकास आणि 1 लाख रेराअंतर्गत तक्रारीचा झटपट निपटारा याशिवाय अपूर्ण घरबांधणी प्रकल्पांच्या पुर्ततेसाठी 25 हजार कोटी रुपयांचे अर्थ सहाय्य देण्यात आले. आर्थिक प्रगतीमुळे विकास व रोजगाराच्या संधी वाढल्या.

डिजिटल इंडिया मोहीमेने अदभूत यश मिळवले. जगात सर्वात जास्त डिजीटल व्यवहार भारतात होतात, भीम, यूपीआय, को-विन ही ॲप जगभर सर्वोत्कृष्ट ठरली. सोशल प्लॅटफॉर्मवर 60 कोटी भारतीय आहेत.

जगातील सर्वात वेगाने प्रगती करणारा देश भारत ठरला आहे. जेव्हा अमेरीका, चीन, युरोप यांचा विकासाचा वेग 2-4 टक्के असताना भारताच्या विकासाचा वेग 7% आहे. जागतिक बँक, मॉनिटरी फंड, मॉर्गन स्टॅन्ले सारख्या संस्थांच्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे. युरोप मधील अनेक देशात मंदीचे सावट आहे, पण भारताची वेगवान प्रगती चालू आहे आणि गरीबी एक टक्के पेक्षा कमी आणि बेरोजगारींचा दर ही कमी झाला आहे.

महागाईचा दर इंग्लंड 9 टक्के, युरोप 8 टक्के अर्जेंटीना 100 टक्के, ब्राझील 24 टक्के, इंडोनेशीया 9 टक्के असताना भारताने उत्तम आर्थिक व्यवस्थापन करीत हा दर सातत्याने 5 टक्के च्या खाली ठेवण्यात यश मिळविले.

आपली निर्यात सतत वाढून ती 750 बिलियन यापेक्षा जास्त झाली, परकीय चलनाची गंगाजळी अत्युच्च पातळीवर आहे. यामुळे भारत हे जगात होणाऱ्या गुंतवणूकीचे आकर्षण केन्द्र बनला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत भारत एक चमकता तारा म्हणून ओळखला जातो. औद्यौगिक, शेती आणि सेवा क्षेत्रांचा सतत विकास, मजबूत मागणी आणि सुधारणा यामुळे हे घडून आले.

50 हजार किमी. चे नवे हायवे, 4 लाख किमी. चे ग्रामीण रस्ते, 70 नवे विमानतळ आणि 111 नवे जलवाहतुक मार्ग, 20 शहरात मेट्रोची प्रगती, 18 वंदे भारत एक्सप्रेस, रेल्वे मध्ये मोठी गुंतवणूक, सुमारे 70 छोट्या बंदरांची निर्मिती, उडान योजना, स्वच्छ रेल्वे स्टेशन, हा प्रत्यक्ष विकास सर्व जगात वाखाणला जातो.

100 कोटी नागरिकांना मोफत कोविड प्रतिबंधक लस, 80 कोटी नागरिकांना गेले 35 महिने मोफत रेशन, 50 कोटी नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत इलाज, 11 कोटी शेतकऱ्यांना शेत सुधारण्यासाठी प्रत्येकी 26 हजार रुपये, 48 कोटी नागरिकांची जनधन खाती, महिलांना नवीन व्यावसायासाठी योजनेतून कर्ज, 30 कोटी नागरिकांना सुरक्षा विमा तर 13 कोटी नागरिकांना जीवन विमा, 11 कोटी घरात शौचालय, 10 कोटी महिलांना उज्वल गॅस योजना, 10 कोटी घरात नव्याने नळ जोडणी, 3.5 कोटी नागरिकांना प्रधान मंत्री आवास, 3 कोटी घरात वीज असा जन कल्याणकारी योजनेतून गरीबांना सक्षम बनवले.

शेतकऱ्यांना एमएसपी उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के अधिक देण्याचा क्रांतिकारी निर्णय अमलात आणला, विमा योजनेत शेतकऱ्यांना 1 लाख 33 हजार कोटींची नुकसान भरपाई मिळाली. 1260 ई मंडीमुळे शेतकरी आपला माल कुठेही पाठवू शकतात.

खतांच्या अनुदानात 5 पट वाढ, शेती अर्थसंकल्पात 5 पट वाढ, 10 कोटी शेतकऱ्यांना मृदा संधारण कार्ड, 20 लाख कोटींचे शेती कर्ज या सर्वाचा परिणाम धान्य उत्पादन व निर्यात वाढली.

370 कलम हटवल्यांनातर काश्मीर मधील दगडफेक संपली, आतंकवाद कमी झाला, देशी-विदेशी गुंतवणूक व पर्यटन सतत वाढत आहे. आता तो प्रदेश मोठी प्रगती करीत आहे.

केदारनाथ, महाकाल, सोमनाथ, काशी, देवधर, चारधाम, करतारपूर साहेब या सांस्कृतिक वारसाच्या महत्वाच्या तीर्थ क्षेत्रांचा विकास,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील महत्वाच्या 5 स्थानांचा विकास, सरदार पटेल व नेताजी बोस यांचे पुतळे अशी अनेक कामे 9 वर्षात झाली.
प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांची ‘देश प्रथम’ निती त्यासाठी सतत कष्ट आणि ‘सन्यस्त कर्मयोगी’ ही प्रतिमा देशाला पुढे नेत आहे.
नऊ वर्षाच्या कामाचा अहवाल 20 कोटींहून अधिक घरी जाऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देणार आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....