पुणे;कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण 2014 पासून रखडले आहे. येथे 2018 पासून 22 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर 45 जण गंभीर जखमी झाले आहेत. येथे एकूण 22 अपघातीस्थळे निर्माण झाली आहेत. राजकीय खाऊ स्पर्धेत मुबलक नैसर्गिक संपदा लाभलेला हा रस्ता आणि परिसर आता काँक्रिटीकरणा च्या राजकीय लाळटपगेकिरी मुळे मोठी दुर्धर अवस्था जगतो आहे. जमिनीवर ताबे,टेकडी ची लचके तोड,बेकायदेशीर बांधकामे, दारूची दुकाने यामुळे येथील निसर्गावर प्रचंड हल्ले झाले. आणि पुढारी मात्र याव त्याव करत टिमकी वाजवत स्वतःच स्वतः चा डंका पीटविण्यात दंग आहेत.
वाहतूक पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणात कात्रज चौकात 16 तर खडी मशीन चौकात सहा अपघाती स्थळे निर्माण झाली आहेत. येथे तात्पुरत्या उपाययोजना करुनही अपघातांचे प्रमाण कमी झालेले नाही. अपघात होण्याच्या कारणांचा विचार करता, रखडलेले रस्त्याचे काम, रस्त्याची दुरवस्था, मोठ्या प्रमाणातील अवजड वाहतूक, दुभाजकाचा अभाव,प्रचंड अतिक्रमणे, राजकिय अनास्था कारणीभूत ठरत आहे.
आरएमडी शाळेसमोर शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास झालेल्या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाला. हे रुंदीकरण असेच रखडले तर आणखी किती जणांचा बळी जाणार असा प्रश्न स्थानिक नागरिक प्रशासनाला विचारत आहेत.
यासंदर्भात वाहतूक शाखेने दिलेली माहिती अशी की, कात्रज-कोंढवा रस्त्यावरुन दररोज सात ते आठ हजार वाहनांची वाहतूक होते. यामध्ये अवजड वाहनांचे प्रमाण 20 टक्के आहे. अवजड वाहनांमुळे रस्ताही खराब झाला आहे. महापालिकेने 2018 मध्ये रस्त्याचे रुंदीकरणाचा निर्णय घेऊन भुमिपुजनही केले. मात्र, तेंव्हापासून रुंदीकरणाचे काम रेंगाळले आहे. परिणामी, या रस्त्यावरील अपघात वाढल्याचे भारती विद्यापीठ आणि कोंढवा पोलीस ठाण्यातील नोंदणी वरून स्पष्ट होते. कात्रज चौक ते राजस सोसायटीपर्यंत उड्डाणपुल करूनही थोडीफार वाहतूक सुरळीत झालेली नाही. मात्र, राजस सोसायटीपासून खडीमशीनपर्यंत ठिकठिकाणी रस्त्याच्या रुंदीकरणाची कामे सुरु आहेत.
भूसंपादनामुळे रखडलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्यावर वाहतूक सुधारणा करण्याची कामे महापालिकेने वाहतूक पोलिसांच्या मदतीने वर्षभरापासून सुरू केली आहेत. रस्त्याच्या कडेचे अतिक्रमण काढणे, साइड पट्ट्यामध्ये डांबरीकरण करून दोन्ही बाजूने रस्ता मोठा करणे, दुभाजक टाकणे ही कामे हाती घेतली गेली होती.ज्यात राजकिय अनास्थेमुळे अडथळेच निर्माण केले गेले.