ग्रहगोल अनेक…आपली वसुंधरा फक्त एक!

Date:

ब्रह्मांडात अनेक आकाशगंगा आहेत, त्यात अनेक ग्रहगोल सामावले आहेत. पण…आपली वसुंधरा फक्त एकच आहे. चला, तिचे रक्षण करण्याचा, तिला जपण्याचा निर्धार करूया!

पर्यावरणातील तापमान मानव आणि निसर्गाच्या दृष्टीने अत्यंत वेगाने वाढते आहे. यामुळे अनेक सजीवांचे अधिवास नष्ट होण्यासोबत पृथ्वीवरील एक दशलक्ष प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. प्रदूषणामुळे हवा, पाणी आणि भूमीची गुणवत्ता घसरते आहे. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी आपल्या वसुंधरेला आणखी हानी होण्यापासून वाचवणे हा एकमेव पर्याय आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या विषयावर चर्चा आणि कृती अपेक्षित आहे.

पन्नास वर्षापूर्वी स्टॉकहोम घोषणेला अनुसरून केनियातील नैरोबी येथे ५ जून १९७२ रोजी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. त्याला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत असल्याने स्टॉकहोम+५० उपक्रमाच्या माध्यमातून जगभरात वसुंधरेच्या रक्षणासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण रक्षणाचे प्रयत्न आणखी महत्त्वाचे ठरतात.

जागतिक तापमान वाढीची समस्या

जग वेगाने पुढे जात असताना पर्यावरणाची परिस्थिती आणखी नाजूक होत आहे. घनकचऱ्याचा प्रश्न, जंगलाचे कमी होणारे क्षेत्र, समुद्राची वाढती पातळी, ध्रुवीय प्रदेशाचा वितळता बर्फ, पूर, वादळ, प्रदूषीत नद्या, प्लास्टिकचा वाढता वापर, तापमान वाढ, लहरी हवामान अशा अनेक समस्या आपल्यापुढे आहेत. जागतिक तापमान वाढ १.५ अंशापेक्षा कमी ठेवण्यासाठी हरितगृह वायू उत्सर्जन निम्मे करण्याची गरज आहे. आत्ताच पर्यावरणाचा विचार न केल्यास वायू प्रदूषणाचे प्रमाण ५० टक्के वाढेल आणि पर्यावरणात मिसळणारा प्लास्टिक कचरा २०४० पर्यंत तिप्पट होईल.

अजूनही वेळ गेलेली नाही

या सर्व समस्येच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी समाजाला सर्वसमावेशक आणि न्याय्य विकास प्रक्रीयेसाठी प्रवृत्त करावे लागेल. यासाठी आवश्यक स्वस्त तंत्रज्ञान उपलब्ध असणे ही आशेची आणि उत्साह वाढविणारी बाब आहे. शाळकरी विद्यार्थी आणि महाविद्यालयीन तरुण भविष्यातील अनुकूल बदलांचे प्रमुख शिलेदार आहेत. त्यांच्यापर्यंत विषयाचे गांभीर्य पोहोचविणे संस्था आणि समाजातील प्रबुद्ध नागरिकांची जबाबदारी आहे. तरुणांना केवळ पर्यावरण विषयाच्या एखाद्या उपक्रमात सहभागावर समाधान न मानता शाश्वत विकासाच्या संकल्पना पुढे नेण्यासाठी संशोधनात सहभाग आणि त्यादृष्टीने नवे कौशल्य शिकण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल.

आपण काय करू शकतो

परिसंस्थेचा घटक म्हणून निसर्गाकडून बरेच काही मिळवताना निसर्गाला आणि पर्यायाने वसुंधरेला जपण्यासाठी आपण अत्यंत छोट्या कृतीतून योगदान देऊ शकतो. प्लास्टिकचा वापर बंद करणे, घनकचऱ्याचे वर्गीकरण करून त्याची योग्य विल्हेवाट लावणे, पाण्याचा मर्यादीत वापर, सौर ऊर्जेचा वापर, ई वाहने किंवा सायकल सारख्या वाहनांचा उपयोग, सार्वजनिक वाहतूक सुविधेचा अधिकाधिक वापर, सेंद्रीय शेतमाल खरेदी, फ्रीज, वातानुकुलन यंत्रणेचा मर्यादित वापर, इमारतीभोवती जलपुर्नभरण व्यवस्था, वृक्षारोपण, कागदाचा वापर कमी करणे, जलस्त्रोतांतील कचरा स्वच्छ करण्याचे उपक्रम, अशा लहान लहान बाबी महत्वाच्या ठरतील. सामुहीकरित्या वृक्ष संवर्धनही तेवढेच महत्त्वाचे आहे.

निसर्गासोबत सहचर्य ठेवूनच आपल्या वसुंधरेचे रक्षण शक्य आहे आणि त्यासाठी त्वरित कृती गरजेची आहे. हे संकट प्रत्येकाच्या दारात आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपली भूमिका समजून घेतल्यास, त्याविषयी इतरांशी चर्चा केल्यास आणि परस्परांच्या सहकार्याने सकारात्मक कृती केल्यास ही वसुंधरा आपल्यासाठी आनंददायी अधिवास ठरेल.

वसुंधरेच्या अंगाखाद्यांवर खेळणारे प्राणी-पक्षी, बहरणारे वृक्ष-वेली, खळखळणाऱ्या नद्या हे तिचे वैभव आहे. ते नष्ट होताना तिला होणाऱ्या वेदना आपल्या रोजच्या जीवनाचा भाग होण्याआधी तिची आर्त हाक ओळखून आत्ताच एक पाऊल पुढे टाकू या, आपल्या गावात, शहरात, परिसरातील पर्यावरण रक्षणाच्या उपक्रमात सहभागी होऊया…शेवटी आपली एकच वसुंधरा आहे…आपल्याला पोसणारी, वाढवणारी, आपल्या अंगाखांद्यावर खेळवणारी!

-जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवसेना उबाठा पक्ष: पुण्यातील शहर नेतृत्वात फेरबदल होण्याचे संकेत

“संघटना हीच शिवसेनेची ताकद; पुण्यात ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे...

विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार!

मेट्रो-३ च्या कामासाठी 'पीएमआरडीए' 'ॲक्शन मोड'मध्ये; अतिरिक्त आयुक्तांकडून 'ग्राउंड...

‘फुलचंद पाना’तून नशेच्या गोळ्या

पुणे-पुणे पोलिसांनी 'फुलचंद पानात' नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर...

नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार

नव्या ६० केंद्रांना मंजुरी,ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२००...