पुणे-धायरी कडून राजाराम पुलाकडे वळणाऱ्या वाहनांची गैरसोय कमी होऊन, तसेच राजाराम पूल चौकातील वाहतूक कोंडी टळावी, यासाठी चौकातील मैलाशुद्धीकरण प्रकल्पाची भिंत 15 फूट आत घेण्याच्या कामाला आज सौ.नागपुरे यांच्या प्रयत्नातून सुरुवात करण्यात आली.
पाणीपुरवठा विभाग, व मनपा प्रशासन यांच्यात समानव्य साधून, पाठपुरावा करून या कामास सौ.नागपुरे यांनी गती दिली .मनपा अधिकारी श्री.बोनाला साहेब तसेच वाहतूक अधिकारी.श्री.कर्पे साहेब यांच्याबरोबर 23 जून रोजी प्रत्यक्ष पाहणी सौ.नागपुरे यांनी केली व आज कामास सुरुवात करण्यात आली. पर्यायी रस्ते, प्रत्येक चौकात ट्राफिक पोलीस, चौक रुंदीकरण, सनसिटी भाजी मंडई येथील पूल, या माध्यमातून सिंहगड रस्ता वाहतूक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे सौ.नागपुरे यांनी सांगितले.
नगरसेविका सौ.मंजुषा नागपुरे यांच्या प्रयत्नांना यश; राजाराम पुलाच्या रुंदीकरणाला सुरुवात ।
Date: