मुंबई-मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकार गंभीर असून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणार असल्याचा पुनरुच्चार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच राम मंदिराच्या निर्मितीने देशात नवा अध्याय सुरु होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तर काँग्रेस आमदार सुनील केदार यांची आमदारकी ही कायद्याप्रमाणे रद्द केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही पूर्ण शक्तीने हे सगळं काम करत आहोत, कुठेही ओबीसी समाजाला त्रास होणार नाही, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, याची संपूर्ण काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर अत्यंत सकारात्मक कार्यवाही हे राज्य सरकारच्या वतीने सुरू आहे. इंडिया अलायन्स किंवा इंडिया आघाडी ही कुठलीही आघाडी नाही, ज्या लोकांना असे वाटते की मोदीजींमुळे त्यांच्या भ्रष्टाचाराचे दुकान आणि त्यांच्या परिवारवादाचे दुकान बंद होणार आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संजय राऊत रोज वेगवेगळे आरोप करतात. त्यांच्या आरोपांना उत्तर देणे मी आता बंद केले आहे. त्यांच्या आरोपांना देण्याइतकी माझी पातळी खाली गेलेली नाही, असा पलटवार फडणवीस यांनी केला आहे. सलीम कुत्ता सोबतची पार्टी भाजपच्या पदाधिकाऱ्याने आयोजित केली होती. व्यंकटेश मोरे असे त्याचे नाव आहे. आजही मोरे हा भाजपचा पदाधिकारी आहे. आता चौकशी करा, असे म्हणत राऊत यांनी व्यंकटेश मोरेचे उपमुख्यमंत्री फडणवीसांसोबतचे फोटोही दाखवले होते. यावर फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मकतेने काम करत आहे. सरकारची ही सकारात्मकता लक्षात घेता मनोज जरांगे यांनी उपोषणाचे निर्णय घेऊ नये असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा पुनरुच्चारही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मकतेने काम करत आहे. मुख्यमंत्री शिंदे स्वतः याप्रकरणी जातीने लक्ष देत आहेत. राज्य मागासवर्गीय आयोगाने वेगाने काम सुरु केले. तर शिंदे समितीचा दुसरा अहवाल आला असून तिसरा अहवालही येणे अपेक्षित आहे. त्यामुळे राज्य सरकारची सकारात्मकता पाहता जरांगे यांनीही असा निर्णय घेऊ नये.

