बीड-मराठा आरक्षणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका स्पष्ट करताना म्हणाले, कोणीही कुठलीही मागणी केली तरी सरकारला कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावं लागेल. कायद्याच्या चोकटीत टिकणारं आरक्षण द्यावं लागेल.या अजित पवार यांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील म्हणाले, आम्ही कायद्याच्या चौकटीबाहेरचं काही मागितलेलं नाही. ५४ लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. इतर कुठल्याही समाजातील लोकांच्या इतक्या नोंदी सापडल्या नाहीत. याआधी ज्यांना आरक्षण दिलं आहे त्यापैकी अनेक समाजांच्या नोंदी नाहीत, अनेक समाज मागास सिद्ध झालेले नाहीत, तरीदेखील त्यांना आरक्षण दिलं आहे. परंतु, मराठ्यांकडे नोंदी आहेत, ते मागास आहेत हे सिद्ध झालं आहे, तरीही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. सरकारच्या नजरेत कायद्याची चौकट उलटी आहे का? ज्या समाजांच्या नोंदी नाहीत, जे मागास सिद्ध झालेले नाहीत त्यांना आरक्षण द्यायचं आणि जे मागास सिद्ध झालेत किंवा ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण द्यायचं नाही, अशी सरकाची उलटी चौकट आहे का? अजून किती दिवस आम्हाला वेड्यात काढणार?
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा ठरलेल्या मनोज जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना असे खडेबोल सुनावलेत. तुम्ही आतापर्यंत स्वतःला हुशार समजत होता. लोकांना वेड्यातही काढत होता. पण आता चालणार नाही. जनता आता हुशार झाली आहे. आम्ही आता वेड्यात निघणार नाही. आम्हाला आरक्षण हवे असून, आम्ही ते घेतल्याशिवाय सोडणार नाही, असे ते म्हणालेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अवघ्या राज्याचे राजकारण पेटले आहे. मनोज जरांगेंनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण देण्याची मुदत दिली आहे. ही मुदत उद्या संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी शनिवारी पुन्हा एकदा सरकारला मराठा समाजाला वेड्यात न काढण्याचा इशारा दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरक्षणावरील सरकारची भूमिका स्पष्ट करताना कुणी कोणतीही मागणी केली, तरी सरकारला कायद्याच्या चौकटचीत राहून काम करावे लागेल, असे ठणकावून सांगितले. त्यावर जरांगे यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला.
मनोज जरांगे म्हणाले की, आम्ही कायद्याच्या चौकटीच्या बाहेरचे काहीच मागितले नाही. राज्यात आतापर्यंत 54 लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. इतर कोणत्याही समाजातील लोकांच्या अशा नोंदी सापडल्या नाहीत. यापूर्वी ज्यांना आरक्षण दिले, त्यापैकी अनेक समाजांच्या नोंदी नाहीत. त्यानंतरही ते मागास असल्याचे सिद्ध झाले. याऊलट मराठा समाजा मागास असल्याचे सिद्ध झाले तरी त्याला आरक्षण दिले जात नाही. असे का?
किती दिवस वेड्यात काढणार?
मनोज जरांगे पुढे म्हणाले की, सरकारच्या नजरेत कायद्याची चौकट उलटी आहे का? ज्या समाजांच्या नोंदी नाहीत, जे समाज मागास सिद्ध झाले नाही, त्यांना आरक्षण द्यायचे आणि जे मुळात मागास आहेत, ज्यांच्याकडे नोंदी आहेत, त्यांना आरक्षण नाकारयचे, अशी सरकारची कायद्याची उलटी चौकट आहे का? आम्हाला अजून किती दिवस वेड्यात काढणार? असेही जरांगे यावेळी बोलताना म्हणाले.
दुसरीकडे, मनोज जरांगे यांची आज बीडमध्ये इशारा सभा होणार आहे. या सभेद्वारे मनोज जरांगे मराठा आंदोलनाची पुढील रणनीती जाहीर करण्याची शक्यता आहे. जरांगे यांच्या सभास्थळी किल्ल्याची प्रतिकृती असलेले भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या सभेला येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी 3 टन खिचडी, 4 लाख पाणी बॉटल आणण्यात आल्या आहेत.

