चेंगराचेंगरीत मृत्यूप्रकरणी 4 तासांपूर्वी झाली होती अटक, पीडित व्यक्ती खटला परत घेण्यास तयार
पुष्पा-2’च्या प्रीमियरदरम्यान एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी हैदराबाद कोर्टाने अभिनेता अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या अभिनेत्याला शुक्रवारी सकाळी 12 वाजता त्याच्या घरातून अटक करण्यात आली. यानंतर त्याला ४ वाजता न्यायालयात हजर करण्यात आले.
अल्लू 4 डिसेंबरला हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये न कळवता पोहोचल्याचा आरोप आहे. त्यामुळे तेथे जमाव जमा झाला आणि चेंगराचेंगरी झाली. अनेक जण जखमी झाले.या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी संध्या थिएटरचे व्यवस्थापन अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षा पथकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, महिलेच्या मृत्यूप्रकरणी दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यासाठी अभिनेत्याने उच्च न्यायालयात अपील केले आहे.
अल्लू अर्जुन आणि त्याच्या टीमनेही महिलेच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला होता. अभिनेत्याने मृत रेवतीच्या कुटुंबाप्रति शोक व्यक्त केला आणि त्यांची भेट घेतली. अभिनेत्याने 25 लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासनही दिले होते.
दरम्यान अल्लू अर्जुनने आपल्या अटकेच्या पद्धतीवर आक्षेप घेतला आहे. पोलिसांनी त्याला नाश्ता पूर्ण करू दिला नाही, असा दावा अभिनेत्याने केला आहे. कपडे बदलण्याचीही परवानगी दिली नाही.
एका व्हिडिओमध्ये अभिनेता घरातून खाली येतो आणि पार्किंगमध्ये येतो. तिथे त्याचे सर्व्हंट धावत येतात आणि चहा-पाणी देतात. व्हिडिओमध्ये तो चहा पिताना दिसत आहे. यावेळी त्याची पत्नी स्नेहा रेड्डी दिसत आहे. अल्लू त्याच्या पत्नीला समजावतो. यानंतर पोलीस त्याला सोबत घेऊन जातात.