पुणे–केंद्र, राज्य सरकारला जाग आणण्यासाठी दिनांक (Pune) 27 ते 30 डिसेंबर दरम्यान भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा आयोजित केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (पवार गट) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
दिनांक 27 डिसेंबरला शिवनेरीपासून भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे. दिनांक 30 डिसेंबर रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे.
ग्रामीण व शहरी भागातून हा मोर्चा मार्गस्थ होणार आहे. राष्ट्रवादी (Pune) काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मोर्चाची सांगता सभा होणार आहे.
या सभेला महाविकास आघाडीमधील अनेक नेते मंडळीदेखील उपस्थित राहणार आहेत.
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयामध्ये भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
देशातील सर्व घटकांतील नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्या नागरिकांच्या प्रश्नावर संसदेत आवाज उठविल्यावर खासदारांचे निलंबन केले जाते, हे दुर्दैव आहे, असेही कोल्हे म्हणाले.

