सबरीमाला अयप्पा सेवा समाजाची रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी
मुंबई दिनांक ७ नोव्हेंबर २०२४
अय्यपन भक्तांसाठी मुंबई ते चेंगन्नूर (केरळ) या मार्गावर सबरीमालाला दर्शनासाठी जाण्याकरिता थेट विशेष ट्रेन सुरू करावी अशी मागणी सबरीमाला अयप्पा सेवा समाजाच्या प्रतिनिधींनी रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्र लिहून केली. भाविकांची मागणी लक्षात घेता १६ नोव्हेंबर ते २० जानेवारी या काळात मुंबई ते चेंगन्नूर पर्यंत दर आठवड्याला एक विशेष ट्रेन सोडली जाईल अशी हमी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
मुंबई ते चेंगन्नूर (केरळ) या विशेष ट्रेनमुळे सुमारे एक लाख भाविकांना फायदा होणार आहे. यावेळी श्री. मणि बालन (सचिव, मुंबई भाजपा), श्री. मुथ्थू कृष्णन (दक्षिण भारतीय सेल अध्यक्ष), माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री श्री. व्ही. मुरलीधरन यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.