‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी आधार जोडणी करण्याचे आवाहन ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेची रक्कम न आलेल्या महिलांनी आपल्या बँक खात्याशी आधारकार्ड जोडणी व सिडींग करण्यासह आपले बँक खाते सुरू असल्याची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणे तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेबाबत कोणतीही अडचण असल्यास आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये संपर्क साधावा, असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती मनिषा बिरारीस यांनी कळविले आहे.
पुणे- SMS आल्यावर आनंदित होऊन बँकाकडे धावलेली लाडक्या बहिणींची पावले आता बँकांनी सुरु केलेय त्रासदायी वर्तनामुळे मंदावली आहेत . सरकारने सुरु केलेल्या लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा मिळणे ज्यामुळे सरकारला दुर्लभ होऊ शकणार आहे असी नीती काही बँकांनी अवलंबली असल्याचे दिसून आले आहे. तुमचे खाते अॅकटीव्ह नाही असे सांगून नवीन खात्याचे फॉर्म देणे, नंतर जुने खाते अॅकटीव्ह करण्यास फॉर्म देणे,खाते १५ दिवसांच्या नंतर अॅकटीव्ह होईल सांगणे, ATM कार्ड नसताना , चेक बुक नसताना वीड्रॉल स्लीप वर पैसे न देता ,चेक बुक साठी अर्ज करायला लावणे , अशा पद्धतीचा कारभार धनकवडीतील महाराष्ट्र बँकेने सुरु केल्याने येथे खाते असलेल्या गोरगरीब लाडक्या बहिणी हेलपाटे मारून त्रस्त झाल्या आहेत तर इकडील अक्सीस बँकेने एक हप्ता दिल्यावर दुसऱ्या हप्त्याचा sms आलेल्या महिलांना देखील पैसे आलेत पण ते इथे रिफ्लेक्ट होत नाहीत असे सांगून हेलपाटे मारायला लावल्याचे सांगण्यात येते आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेय लाडक्या बहिणीच्या योजनेला तुडुंब प्रतिसाद मिळाला . कार्यकर्त्यांनी देखील हि योजना घरोघरी पोहोचविली आणि या योजनेमुळे भाजपवासियांना आणि एकूणच शिंदे गट , पवार गट अशा सत्तेतील सर्वांना निवडणुकीसाठी हि योजना लाभदायी ठरेल अशी मोठी आशा वाटू लागली . परंतु अशा पद्धतीने बँकांनी वर्तन ठेऊन महिलांचे हेलपाटे वाढवीत पैसे देण्याचा आखडता हाथ घेतल्याचे चित्र दिसू लागल्याने आता आनंदित होऊन बँकांकडे जाणारी पावले मंदावू लागल्याचे जाणवू लागले आहे .आधार कार्ड, पॅन कार्ड,निवडणूक ओळखपत्र, बँकेचे पासबुक असे सारे असतानाही केवळ आर्थिक स्थितीमुळे त्या बँकांची खाती अविरत पणे सुरु न ठेऊ शकल्याने त्यांची स्थिती बँकांनी अशी करवून पैसे वापरण्याचा घाट सुरु ठेवला कि काय ? असा प्रश्न निर्माण करण्याजोगी स्थिती आहे. धनकवडीतील बँकचा अनुभव मोठा त्रस्त करणारा असल्याच्या जास्त तक्रारीआहेत .