सकारात्मक विचाराने कार्य करा- झोराष्ट्रीयन कॉलेजच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. मेहर मास्टर मूस

Date:

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे प्रेषित झरथुष्ट्र व हुएन -ए-त्संग यांच्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण

 पुणे, दि. ४ ऑक्टोबर ः “सकारात्मक विचार ठेवा, उत्तम कार्य करा आणि चांगले बोला असा संदेश प्रेषित झरथुष्ट्र यांनी मानवतेला दिला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी प्रेम आणि अहिंसेच्या शक्तीच्या आधारे विश्वशांतीसाठी प्रयत्न केले. जगातील सर्व धर्म हाच मानवतावादी संदेश दिला आहे.” असे मत झोराष्ट्रीयन कॉलेजच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. मेहेरे मास्टर मूस यांनी व्यक्त केले.  
माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि माईर्स एमआयटी आर्टस, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीच्या वतीने गांधी जयंतीच्या निमित्ताने पारशी धर्माचे संस्थापक प्रेषित झरथुष्ट्र आणि चीनी बौध्द भिक्षू व महान दूरदर्शी विद्वान विचारवंत तत्वज्ञ हुएन-ए-त्संग यांच्या पूर्णाकृती ब्राँड पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर व जहांगीर रूग्णालयाचे अध्यक्ष जहांगीर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी होते.
तसेच डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड, एडीटी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस व प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होत.
डॉ. मेहेरे मास्टर मूस म्हणाल्या,”जगातील सर्वात मोठ्या विश्वशांती घुमटात दोन महामानवांचे पूर्णाकृती पुतळे स्थापन केल्याबद्दल डॉ. मेहेर मास्टर मूस यांनी डॉ. कराड यांना शुभेच्छा दिल्या. सर्व धर्मांनी आपल्या तत्वज्ञानातून चांगले मानव घडविण्याचा संदेश दिला आहे. त्याआधारेच विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड शिक्षणाच्या माध्यमातून चांगले मानव घडविण्याचा प्रयत्न करत आहेत.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “प्रेषित झरथुष्ट्र आणि तत्वज्ञ हुएन-ए-त्संग यासारख्या महामानवांनी मानवतेला विश्वशांती आणि एकोप्याचा संदेश दिला. सध्या जग गोंधळ, संभ्रम, हिंसाचार आणि दहशतवादाचा सामना करत असताना, या महान व्यक्तींचा संदेश समाजात प्रसृत होणे आवश्यक आहे. त्यापासून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनी स्वहितापेक्षा विश्वकल्याणाचा विचार केला पाहिजे आणि ज्ञानाची पूजा केली पाहिजे. विश्वशांती घुमट हा ज्ञान पूजेचे स्थान असून, भारत विश्वगुरू होण्यासाठी समाजाला दिशा देण्याची जबाबदारी पार पाडत आहे.”
जहांगीर म्हणाले,”विश्वशांती घुमटाचा परिसर हा खर्‍या अर्थाने धर्मनिरपेक्ष आहे, तसेच सर्व धर्मीयांचे धार्मिक स्थळ आहे. चांगले बोला, सकारात्मक विचार करा आणि योग्य कृत्य करा, असा संदेश देणार्‍या प्रेषितांचे व महामानवांचे पुतळे सर्वांसाठी प्रेरणादायी असून, हे घुमट एकात्मतेचे मंदिर होवो.”
डॉ. विजय भटकर म्हणाले, “नवीन विचार दाबण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा ते नवीन रुपात पुन्हा उदयास आले आहेत. तक्षशिला-नालंदा ही विद्यापीठे जाळली गेली, तरीही ती विश्वशांती घुमट च्या माध्यमातून पुनःस्थापित होऊन मानवतेला शांततेचा संदेश देत आहेत.”
राहुल कराड म्हणाले, ” या विश्वशांती घुमट परिसरात ५४ महामानवांचे पुतळे असून, त्यांनी मानवतावादाचा पाया रचला, तसेच समाजाला भविष्यवेधी विचार दिला. रस्ते वेगळे असले, तरी अंतिम उद्दिष्ट एकच आहे आणि ज्ञानाचा उपयोग हा मानवाच्या कल्याणासाठी झाला पाहिजे.”
डॉ. आर. एम. चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले.
डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मिलिंद पांडे यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सियाने अगोदरही केतनला केला होता मारण्याचा प्रयत्न ?

लोहगड किल्ल्यावर २६ वर्षीय केतनला दरीत ढकलून त्याची हत्या...

पुण्याचा गुटकाकिंग कोण ?कुठवर चालणार छापे सत्र ??

२२.९१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोन आरोपी अटकेत पुणे |...

बाप- लेकीच्या नात्याची‘द्विधा’

बाप आणि लेक हे नातं शब्दांत व्यक्त करणं कठीण असतं. आईच्या कुशीत माया तर वडिलांच्या सावलीत सुरक्षिततेचा आधार असतो. आपल्या लेकीच्या आनंदासाठी झटणारा बाप आणि संकटात वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी लेक, हे नात्याचं सर्वात सुंदर रूप असतं. ‘द्विधा’ या आगामी मराठी चित्रपटातही बाप-लेकीच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि भावनिक जिव्हाळा अत्यंत हळुवार व हृदयस्पर्शी पद्धतीने उलगडण्यात आला आहे. ‘फादर्स डे’चं औचित्य साधत ‘द्विधा’ चित्रपटाचे भावस्पर्शी पोस्टर आणि टिझर प्रदर्शित करण्यात  आला असून येत्या २१ ऑगस्टला हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन निलेश भास्कर नाईक यांचे आहे. निर्माती विदुला रमेश आजगावकर आहेत.  नात्यांमधली ‘द्विधा’ ही फक्त निर्णयांची नव्हे, तर भावनांचीही लढाई असते. विश्वास आणि अपेक्षा यांच्या मधोमध उभं राहिलेलं मन कधी स्वतःसाठी, तर कधी समोरच्यांसाठी झुकतं. ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर आणि अभिनेत्री मानसी कुलकर्णी यांच्या प्रभावी भूमिकांतून ‘द्विधा’ बाप-लेकीच्या नात्याचा हळवा प्रवास प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. या दोघांसोबत रेणूका दफ्तरदार, निमिष कुलकर्णी, आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर, ओवी तानवडे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘द्विधा’ हा केवळ बाप-लेकीच्या नात्याचा चित्रपट नाही, तर प्रत्येक नात्यात येणाऱ्या भावनिक संघर्षाची कहाणी आहे. आयुष्यात एखादी वेळच अशी येते की, मन ‘द्विधा’ अवस्थेत अडकतं. ही भावना अत्यंत संवेदनशीलतेने पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. फादर्स डेच्या निमित्ताने प्रदर्शित झालेला हा टिझर प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करेल, असा विश्वास दिग्दर्शक निलेश नाईक यांनी व्यक्त केला. ‘द्विधा’ चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन, संकलन निलेश नाईक यांनी केले आहे. चित्रपटातील गीते गीतकार मंगेश कांगणे, मंदार चोळकर यांची असून संगीताची जबाबदारी निलोत्पल बोरा आणि शैलेंद्र बर्वेयांनी सांभाळली आहे. निलोत्पल बोरा यांनी नेटफ्लिक्ससाठी अनेक लोकप्रिय वेब सिरीज आणि प्रकल्पांवर काम केले आहे. हंसिका परीक, मयुरी पटवर्धन यांचा स्वरसाज गाण्यांना लाभला आहे. छायांकन सिमरजीत सुमन, अश्विनी पाखरोट,श्रीधर अल्ले यांचे आहे  वेशभूषा विदुला आजगावकर यांची आहे. ध्वनीरचना इक्रामुद्दीन रुस्तम लोचूर तर ध्वनीमिश्रण योगेश कारभारी नेहे, आकाश स्वजन सेनगुप्ता यांनी केले आहे.

फुरसुंगीत स्टील व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार; बिश्नोई गँगच्या कनेक्शनची चर्चा

पुणे-पुण्यात खंडणीसाठी एका व्यावसायिकाच्या कार्यालयासमोर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना...