Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महायुतीची गरज एकट्या भाजपला नाही… आम्हालाही आरे ला कारे म्हणता येते-प्रवीण दरेकरांनी घेतला रामदास कदमांचा समाचार

Date:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर सत्ताधारी महायुतीमध्ये मोठी आदळआपट सुरू झाली आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणी थेट महायुती तोडण्याची भाषा केली आहे.भाजपच्या संयमाला कुणीही दुबळेपणा समजू नये. महायुतीची गरज एकट्या भाजपला नाही, तर सर्वांना आहे, असे दरेकर यांनी म्हटले आहे. दरेकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यामुळे त्यांच्या विधानाला मोठे महत्त्व आले आहे.

रामदास कदम यांनी मुंबई – गोवा महामार्गावरून भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीकेची झोड उठवली. रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री आहेत. ते केवळ चमकोगिरी करतात. त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार करत रामदास कदम यांचे थोबाड फोडण्याची भाषा केली होती. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी थेट महायुती तोडण्याची भाषा केली आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले की, रामदास कदम हे महायुतीतील ज्येष्ठ नेते आहेत. पण त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्याविषयी केलेले विधान अत्यंत अपरिपक्वतेचे आहे. त्यांच्या काही समस्या असतील, तर त्यांनी ती चार भिंतीच्या आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडाव्यात. पण त्यांचा स्वभाव हा खळबळजनक बोलण्याचा आहे. महायुतीचा धर्म प्रत्येकाने पाळावा. अन्यथा आम्हालाही आरे ला कारे म्हणता येते.

प्रवीण दरेकर पुढे बोलताना म्हणाले की, रत्नागिरीत आमचे 3 आमदार आहेत. ठाण्यात नरेश म्हस्के यांना पक्षाने खासदारकी दिली. रवींद्र वायकर यांनाही आमच्या लोकांनी विजयी केले. नाशिकची जागाही आम्ही शिंदे गटाला दिली. त्यामुळे तुम्ही उणीदुणी काढत असाल तर आम्हीही तयार आहोत. महायुतीची गरज केवळ भाजपला नाही. सर्वांना आहे. एवढे चांगले वातावरण असताना कुणीही मिठाचा खडा टाकू नये. आमचे कार्यकर्तेही मनावर दगड ठेवून महायुतीत लढत आहेत.

प्रवीण दरेकर यांनी यावेळी रामदास कदम वैफल्यग्रस्त झाल्याचीही टीका केली. रामदास कदम यांचा मुलगा जेथून आमदार आहे, तिथे त्यांना भाजपच्या मदतीशिवाय निवडून येता येत नाही. त्यांच्या मुलाची मंत्री होण्याची इच्छा होती. पण ते मिळाले नाही. यामुळे राजकीय पटलावरून गायब झाल्यामुळे रामदास कदम वैफल्यग्रस्त झालेत. यातून त्यांची खदखद बाहेर येत आहे. भाजप एक राष्ट्रीय पक्ष आहे. राज्यभर आमचे जाळे व संघटना आहे. त्यामुळे आमच्या संयमाला कुणीही आमचे दुबळेपण समजू नये, असे ते या प्रकरणी शिवसेनेला इशारा देत म्हणाले.

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी रामदास कदम यांच्यावर शरसंधान साधले. अशाप्रकारचे आरोप कोणत्या युती धर्मात बसतात. रामदास कदम यांचे काही म्हणणे असेल तर त्यांनी पक्षाच्या अंतर्गत बैठकीत मांडावेत. प्रत्येकवेळी भाजपच्या नेत्यांना वेठीस धरणे योग्य नाही. त्यातून चांगली भावना तयार होती. मी रामदास भाईंचे म्हणणे जाणून घेईल, असे फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले होते रामदास कदम?

रामदास कदम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याविषयी बोलताना म्हणाले होते की, मागील 14 वर्षांपासून मुंबई – गोवा महामार्गाचे काम होत नाही. चाकरमान्यांचे हाल होत आहेत. समृद्धी महामार्गाचे काम 3 वर्षांत पूर्ण होते. मग मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण का होत नाही? रवींद्र चव्हाण यांना शिवसेनेची एलर्जी आहे. रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत, असे ते म्हणाले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

येत्या दोन वर्षांत २०२७ पर्यंत मलेरियाचे देशातून समूळ उच्चाटन करण्यासाठी झाली हि  कंपनी सज्ज…

केंद्र सरकारच्या धोरणाशी सुसंगत कार्यप्रणाली स्थानिक स्वराज्य संस्था आणि संस्थांच्या सहकार्याने वेगवेगळ्या भागांतून मलेरिया, डेंग्यू हद्दपार करण्यासाठी कंपनीचे धोरण मुंबई, २२ एप्रिल २०२५ – दरवर्षी २५ एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिन साजरा केला जातो. जागतिक मलेरिया दिन काही दिवसांवर येऊन ठेपला असताना युपीएल एसएएस कंपनीने मलेरिया आणि डेंग्यूच्या समूळ उच्चाटनासाठी सर्वतोपरि प्रयत्न करित असल्याचे आश्वासन दिले आहे. कंपनीने केंद्र सरकारच्या आरोग्याविषयक धोरणांतून तसेच उपाययोजनांतून डेंग्यूसारख्या जीवघेण्या आजारावर आळा घालण्यासाठी तत्परता दर्शवली. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन आराखडा आणि राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन धोरणात्मक योजना यांसारख्या सर्वसमावेशक धोरणांना पाठिंबा देण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जाते. येत्या दोन वर्षांत २०२७ पर्यंत देशातून मलेरियाची एकही केस सापडता कामा नये, हे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. युपीएल एसएएस कंपनी देशभरातील महानगरपालिकांच्या सहकार्याने जनजागृतीपर कार्यक्रमांचे नियोजन करत आहे. मलेरियाच्या केसेसवर नियंत्रण यावे म्हणून कंपनीने शहर आणि ग्रामीण भागात वेगवेगळे प्रकल्प राबवण्यावर भर दिला आहे. गुजरात येथील उदवाडा गावात डासांमुळे होणारे आजार कमी करण्यासाठी क्लीन एण्ड ग्रीन चॅरिटेबल ट्रस्टसोबत कंपनीने डासांच्या उत्पत्तीची उगमस्थाने नष्ट करण्याचा प्रकल्प हाती घेतला. तेलंगणा राज्यातील हैदराबाद शहरातील ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेसह विविध कार्यक्रमांचे नियोजन यशस्वीरित्या अंमलात आणले गेले. गुजरात आणि तेलंगणा राज्यातील डासांमुळे होणारया आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी कंपनीने अथक परिश्रम घेतले. दोन्ही प्रकल्पांमध्ये डासांची उत्त्पत्ती आणि संबंधित आजार कमी होत असल्याचे निदर्शनास आले. या दोन यशस्वी प्रकल्पानंतर युपीएल एसएएस कंपनीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. गुजरात, तेलंगणा या राज्यांसह कंपनी आता महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारसबोत मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध कार्यक्रम आखण्याच्या तयारीत आहे. या दोन्ही राज्यांसोबत नव्या प्रकल्पाला सुरुवात झाल्यास कंपनीला शहरी आणि ग्रामीण भागांत राहणा-या लोकांचे जीवनमान सुधारण्यास अधिक प्रखरतेने योगदान देता येईल. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्याचे कंपनीचे मूळ उद्दिष्ट सफल होईल. कंपनीच्या वाढत्या कार्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष डोभाल यांनी आढावा घेतला. ते म्हणाले, ‘‘ आम्ही सुरु केलेली सार्वजनिक आरोग्य मोहिम ही व्यापक क्षेत्रात सुरु आहे. ही मोहिम केवळ शेतीपुरतीच मर्यादित नसून, आम्ही विविध समूहांचा उद्धार आणि पर्यावरणाची काळजी घेण्यासही कटिबद्ध आहोत. केंद्र सरकारच्या आरोग्यविषयक धोऱणांना पाठिंबा देणे, सर्व भारतीयांसाठी निरोगी आणि सुरक्षित जीवनशैली निर्माण करणे हे आमचे उद्देश आहे. म्हणूनच आम्ही डास नियंत्रणासाठी विश्वासार्ह आणि प्रभावी उपाययोजना अंमलात आणली आहे. या उपाययोजनांमुळे कोट्यावधी भारतीयांचे जीवनमान सुधारेल. या बदलांसाठी स्थानिक प्रशासन आणि समुदायांचे सहकार्य गरजेचे आहे. तरच आपल्याला ख-या अर्थाने मलेरिया आणि डेंग्यूमुक्त भारताच्या दिशेने आपली यशस्वी वाटचाल करता येईल.’’ या नवनव्या उपक्रमांबद्दल तसेच कंपनीच्या विस्तारीत कार्याबद्दल कंपनीच्या सार्वजनिक आरोग्य व्यवसायाचे प्रमुख श्री. सुब्रतो पल यांनी माहिती दिली. ते म्हणाले,‘‘ डासांची उगमस्थाने आणि अळ्या नष्ट करणे आणि डासांच्या उत्त्पत्तीवर नियंत्रण ठेवणे हेच कंपनीचे मुख्य धोरण आहे. या धोरणाशी आमच्या भागदारकांनीही सहमती दर्शवली आहे. म्हणूनच आम्ही प्रकल्पाच्या सुरुवातीलाच डासांच्या उत्त्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यावर भर देतो. युपीएल एसएएस डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाटी हरित रसायनाचा वापर करणार आहे. हे रसायन देशात पहिल्यांदाच वापरले जाईल. डासांच्या उत्त्पत्तीला नष्ट करणारे हे अनोखे हरित रसायन जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यताप्राप्त असून, या रसायनाच्या वापराने मानवी आरोग्याला कोणताही धोका पोहोचत नाही. या रसायनाच्या वापराने पिण्याचे पाणीही सुरक्षित राहते. तलाव, विहिरी, वाहत्या पाण्याचा जलस्त्रोत, टाक्या, घर तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पाण्याच्या स्त्रोतात हे रसायन वापरता येईल. डासांची संख्या नियंत्रणात आल्यास डेंग्यू आणि मलेरियामुळे पसरणा-या आजारांची संख्याही आपोआप आटोक्यात येईल. या आजारांचा प्रसार रोखणे हेच कंपनीचे उद्दिष्ट आहे.’’ युपीएल एसएएसद्वारे डासांची उगमस्थाने असलेल्या जागांवर थंड धुरी देणारी यंत्रे वापरली जातात. धुरी देणारी यंत्रे वापरताना वायू प्रदूषण होणार नाही अशा रितीने डिझाईन केली आहेत. ही यंत्रे हाताळायला सोप्पी आहेत, शिवाय या यंत्रांसाठी ऊर्जाही कमी लागते. हे उपाय जागतिक आरोग्य संघटना आणि राष्ट्रीय रोगवाहक नियंत्रण कार्यक्रम या दोन्हींद्वारे मंजूर केलेल्या सूत्रीकरणावर आधारलेले आहेत. या उपाययोजनांमुळे जलपरिसंस्था, मनुष्य आणि प्राणीही सुरक्षित राहतात. या सर्व उपाययोजना युपीएल एसएएसच्या पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाच्या व्यापक धोरणाला अधोरेखित करतात. या योजनांच्या अंमलबजावणीमुळे आता मनुष्याला निरोगी आणि सुरक्षित परिसंस्थेत आरामदायी जीवन जगता येणे शक्य आहे.

शहरी गरीब योजनेतील डायलिसिसचे दर वाढवले !

डायलिसिस चे जास्ती दर आकारणाऱ्या काही खाजगी हाॅस्पिटल्सच्या सोयीसाठी...

अनंतराव पवार अभियांत्रिकीची औद्योगिक अभ्यास सहल संपन्न…

पुणे-               अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज...