चौकशी करणारे किती स्वच्छ आहेत? अंबादास दानवे यांचा सवाल
पुणे- पुण्यातील बिल्डरच्या मद्यपी अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालवत 2 अभियंत्यांना चिरडले. त्यानंतर आरोपीच्या वडिलांनी ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या मदतीने या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी डॉक्टरांना पैसे पुरवले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने एक विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त केले आहे.या समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर पल्लवी सापळे आहेत. पण त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप असल्यामुळे वाद उत्पन्न झाला आहे. नियुक्तीनंतर सापळेंसह समितीचे इतर सदस्य ससून रुग्णालयात दाखल झाले. यावेळी त्यांना त्यांच्यावरील आरोपांविषयी छेडले असता त्यांनी किंचित हसून माझी नियुक्ती शासनाने केली असून, तुम्ही हा प्रश्न शासनालाच विचारा, असे उत्तर दिले.
डॉक्टर पल्लवी सापळे पुढे बोलताना म्हणाल्या की, पुणे कल्याणीनंतर अपघात प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय नियुक्त केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी मी आहे. आमची समिती सदर अपघाताच्या घटनाक्रमाचा तपास करून त्याचा अहवाल सरकारला सादर करेल. ही चौकशी शासनाने ठरवलेल्या निकषांनुसार होईल. त्या दिवशी घडलेल्या घटनेची चौकशी होईल. या प्रकरणाशी संबंधित सर्वांचीच चौकशी केली जाईल, असे त्या म्हणाल्या.
यावेळी पत्रकारांनी पल्लवी सापळेंना त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांविषयी छेडले. त्यालाही त्यांनी झटक उत्तर दिले. त्या याविषयी किंचित हसत म्हणाल्या की, माझी नियुक्ती शासनाने केली आहे. त्यामुळे याचे उत्तर देण्याचे सक्षम अधिकारी शासन आहे, मी नाही.
दरम्यान पल्लवी सापळे यांच्या नियुक्तीवर अंबादास दानवे यांनी चौकशी करणारे किती स्वच्छ आहेत?असा सवाल करत जोरदार हल्ला चढविला आहे,