दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाने अजूनही काही बाबी उजेडात येण्याची शक्यता
पुणे- पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी तपासात दिरंगाई केल्याच्या ठपका ठेवत येरवडा पोलिस ठाण्यातील दोन पोलिस निरीक्षकांचे निलंबन करण्यात आले आहे केवळ दिरंगाई नाही तर या प्रकरणात मोठा भ्रष्ट कारभार झालेला असल्याचा आरोप करत आमदार रवींद्र धंगेकर यांनी आता पोलीस आयुक्तांचीही बदली करा अशी पुन्हा एकदा मागणी केली आहे. तसेच दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर धंगेकर यांनी भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही टोला लगावला आहे , ..आमचा अभ्यास कच्चा म्हणणाऱ्यांची पैलवानकी आता कालबाह्य झाली आहे हेच या कारवाईने दाखवून दिले आहे यांची पैलवानकी नुसती हुजरेगीरीपुरतीच उरली असल्याचे ते म्हणालेत .
ते म्हणाले, अधिकाऱ्यांच्या निलंबन कारवाई खाली आयुक्तांना दडून राहता येणार नाही , आपण केलेल्या माआग्नितील एक मागणी पूर्ण केली म्हणजे आपण दुसर्या मागणीकडे दुर्लक्ष करू असे अजिबात होणार नाही.पब वाल्यांच्या आंदोलना मागे कोणते चेहरे दड्लेत हेही शोधून काढावे लागणार आहे. धंगेकर पुढेअसे म्हणाले,’गेले ६ दिवस आपण सर्व पुणेकरांनी आवाज उठवल्यानंतर आज अखेर या प्रकरणातील २ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आला आहे. मयत अनिश व अश्विनी या दोन्ही मृतांना न्याय देण्याऐवजी त्यांच्या मृत्यूपश्चात “डिल” करत तपासात अक्षम्य चुका करणाऱ्या व हे प्रकरण पद्धतशीर दाबण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सुमारे पाच ते सहा अधिकाऱ्यांपैकी दोन अधिकाऱ्यांचा निलंबन होणे हे या प्रकरणातील पहिले सकारात्मक पाऊल आहे. अगदी सकाळी १२ वाजता घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पुणे पोलिसांनी योग्य तपास केला असे ठणकावून सांगणाऱ्या पुणे पोलीस कमिशनर यांना अचानक हे दोन पोलीस अधिकारी दोषी कसे सापडले…? याचे देखील आश्चर्य वाटते. त्यांनी त्यांचा हा जो वसुलीचा खेळ सुरू केला आहे, तो इतरत्र कुठे जाऊन करावा. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत पुणे पोलीस दलाची बदनामी होईल असे वर्तन करणाऱ्या कमिशनर यांच्या बदली करावी या मागणीवर मी ठाम आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या अपघातप्रकरणी आयुक्त भेटीनंतर मोहोळ यांनी काय म्हटले होते …
लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा अभ्यास कच्चा असतो. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करु शकता. आताच्या निवडणुकीतही पुणेकरांनी ते पाहिलं आणि आता या संवेदनशील प्रकरणातही तेच ! कोणत्याही घटनेत पोलीस ठाणे स्तरावर एफआयआर लिहून घेतला जातो. त्यात लावलेली कलमे योग्य आहेत की नाही, हे वरिष्ठ अधिकारी तपासतात आणि मग तो न्यायालयात जातो. मंगळवारीही उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी हेच सांगितले की, या प्रकरणात कलम 304 हे पहिल्यापासून लावले आहे, म्हणजे मूळ एफआरआय दाखल करतानाच ! ही 19 तारखेचीच कॉपी तुमच्या माहितीसाठी ! कलम 304 त्यात आधीपासूनच आहे. त्यामुळे ‘साप-साप’ म्हणून ‘भुई धोपटणे’ हे धंदे सोडून द्या. पुणेकर तुम्हाला चांगलंच ओळखून आहेत.
असे माजी महापौर मोहोळ यांनी म्हटले होते , त्यावर …तरी म्हटलात अजून तुम्ही कसे आला नाहीत बिल्डरची वकिली करायला असा टोला धंगेकर यांनी लगावला होता .त्यानंतर पुन्हा पोलिसांनी आणखी काही कलमे गुन्ह्यात समाविष्ट केली होती .आज आरोपीच्या वडिलांच्या नंतर आजोबालाही अटक झाली आहे.