Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

प्रधानमंत्री मोदी आणि त्यांचे सहकारी लोकशाहीवरील संकट

Date:

चाकण : हा देश लोकशाही देश आहे. जगातील श्रेष्ठ लोकशाही भारतात आहे. लोकशाहीची आस्था आणि औसुक्य जगाला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी लोकशाहीवर संकट आणू पाहत आहेत; अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या चाकण येथील सभेत केली. यावेळी व्यवस्थेला बेधडक आव्हान देणारे डॉ. अमोल कोल्हे संसदेत हवेतच असं म्हटलं आहे

यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. सचिन आहिर, कामगार नेते शशिकांत शिंदे, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, खासदार ओम राजे निंबाळकर, आदित्य शिरोडकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश उपाध्यक्ष राजमाला बुट्टे पाटील, आमदार संजय जगताप, माजी आमदार जयदेव गायकवाड, राम कांडगे, जगन्नाथ शेवाळे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, विजय शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, शिवाजी वर्पे, सुरेश भोर, अतुल देशमुख, सुधीर मुंगसे, हिरामण सातकर, विजय डोळस, अमोल पवार, देवदत्त निकम, बाबाजी काळे, माऊली कटके, मयूर दौंडकर यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

शरद पवार म्हणाले, येणाऱ्या सरकारकडे जगाचे लक्ष आहे. हा देश लोकशाही असलेला देश आहे. लोकशाहीवर मोदी आणि त्यांचे सहकारी संकट आणू पाहत आहेत. त्यांना घटना आणि संविधान बदलायचे आहे. यावेळी टीका व्हायला लागली त्यावेळी मोदी सांगू लागले आम्ही घटनेला हात लावणार नाही. घटना बदल्याण्यासाठी मोदींचे हात बळकट करण्याचे आवाहन भाजप नेते करीत आहेत. त्यासाठी ४०० खासदार निवडून द्या. याचा अर्थ हा असा आहे कि तुमच्या आमच्या अधिकारावर गदा आणण्याचा डाव त्यांनी तयार केला आहे. त्यापासून आपण सावध भूमिका घेतली नाही तर हिंदुस्थानची लोकशाही धोक्यात जाण्याची भीती पवार यांनी व्यक्त केली.

जवाहर नेहरू इंदिरा गांधीसह जे जे पंतप्रधान झाले; त्यांच्या सभा आम्ही ऐकल्या आहेत; मात्र त्यापेक्षा लाजिरवाणी भाषा पंतप्रधान मोदी करीत आहेत. मोदी राज्यात येतात आणि उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर मोदी टीका करतात मात्र आमच्या अंगाला टीकेमुळे भोके पडणार नाहीत. ते या ठिकाणी नाही त्या गोष्टी सांगतात. नव्या पिढीचा नेता राहुल गांधी पायी सर्व देशात फिरला; लोकांशी संवाद साधला, त्यांची दुःख समजून घेतली; त्यांची मोदी टिंगल करत आहेत. पंडित नेहरू, राजीव गांधी, इंदिरा गांधी यांनी देशासाठी त्याग केला मात्र त्याची नोंद घेणे सोडा तर त्यांच्या बाबत वेडेवाकडे बोलले जात आहे. शेतमालाला रास्त किंमत मिळालीच पाहिजे, प्रत्येकाला काम मिळाले पाहिजे स्रियांचा सन्मान झाला पाहिजे त्यासाठी संसदेत डॉ. कोल्हे यांच्या सारखे नेतृत्व जायला हवे. असंही पवार यांनी म्हटलं आहे.

आ. बाळासाहेब थोरात म्हणाले, देशाचे राज्याचे राजकारण भाजपने पूर्णपणे बिघडले आहे. भाजपने महाराष्ट्राचे जास्त नुकसान केले आहे. मतदारावर आणि मतदानावर आघात होतो कि काय अशी देशात परिस्थिती निर्माण झाली आहे देशाचे काय होणार अशी स्थिती आहे बिघडवलेले राजकारण आपल्याला सुधारायचे आहे. अशा वेळी योग्य प्रतिनिधी आपल्याला संसदेत पाठवायचे आहे. डॉ अमोल कोल्हे यांना लोकसभेत पुन्हा पाठविण्याची जबाबदारी आपली आहे. राज्य आणि देश पुढे न्यायचा आहे आपली जबाबदारी आहे आहे. आपले मत आदर्श लोकप्रतिनिधी डॉ. अमोल कोल्हे यांना देत आहोत ते थेट शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, सोनिया गांधी याना जाणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतील एकता सोसायटीला ८ कोटीची लाच मागणारा सहकार खात्याच्या विनोद देशमुख व भास्कर पोळला बेड्या

दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहाथ पकडलंपुणे:...

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी...

घराण्यांचे वेगळेपण जाणून घेतल्यास भिंतींचा अडथळा जाणवत नाही : पंडित अरुण कशाळकर

पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो...