Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

प्रेक्षक हे देखील आम्हा कलाकारांचे गुरु-महाराष्ट्र भूषण अशोक सराफ

Date:

 ; कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे अशोक सराफ, प्रल्हाद पै, डॉ.कैलास काटकर यांना गुरु महात्म्य पुरस्कार प्रदान 
पुणे : नाट्य किंवा चित्रपट क्षेत्रात अगदी लहानांपासून मोठयांपर्यंत प्रत्येकाकडून काहीतरी घेण्यासारखे असते. अजूनही मी विद्यार्थी आहे. मी करतोय हे लोकांना आवडत आहे. तरी देखील मी पूर्णत्वाला गेलो, असे मी म्हणू शकत नाही. यापुढेही मी बरेच काहीतरी करू शकतो, असे मला वाटते. राजदत्त यांच्याकडून आम्ही नकळत शिकून गेलो. प्रत्येक माणसात वेगळा गुण असतो, त्या न्यायाने प्रेक्षक देखील कलाकारांचे गुरु असतात, असे मत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले.

बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे गुरुमहात्म्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले. यावेळी  ज्येष्ठ सिने दिग्दर्शक राजदत्त, विद्यावाचस्पती डॉ.शंकर अभ्यंकर, ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे तसेच दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, कार्यकारी विश्वस्त डॉ. पराग काळकर, खजिनदार अ‍ॅड. रजनी उकरंडे, उत्सव प्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उपप्रमुख सुनिल रुकारी, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे, महेंद्र पिसाळ आदी उपस्थित होते

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै आणि ज्येष्ठ उद्योजक डॉ. कैलास काटकर यांना यंदाचा गुरुमहात्म्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. निवेदिता सराफ यादेखील यावेळी उपस्थित होत्या. श्री दत्त महाराजांची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह, महावस्त्र व रुपये २५,०००/-  असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

राजदत्त म्हणाले, प्रत्येकाच्या जीवनात दु;ख असतात, राहतात. मात्र, त्याला तोंड देत, त्यावर मात करीत जीवन जगता आले पाहिजे. नैराश्य आणि दु;खाने माणूस अस्वस्थ होऊन जातो. तरी देखील आनंदात जगण्यासाठी माणसाला कष्ट करावे लागतात. आजच्या भोगवादी जीवनात चांगले विचार समाजात रुजविण्याचे कार्य दत्तमंदिर ट्रस्टचे कार्य सुरु आहे.

शंकर अभ्यंकर म्हणाले, कला, अध्यात्म व विज्ञान या क्षेत्रातील दिग्गज आज दत्त मंदिराच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. विज्ञानाने प्रगती केली असली, तरी देखील मानवी जीवनाला दिशा देईल, असे वाटत नाही. विज्ञान हे तटस्थ आहे, मानवाने त्याचा उपयोग कसा करावा, याकरिता अध्यात्माची आवश्यकता आहे.

ते पुढे म्हणाले, ज्ञान आणि विज्ञानाने हातात हात घालून पुढे जायला हवे. मानवी जीवनाची उभारणी त्यावरच व्हायला हवी. विज्ञानाच्या प्रगतीत मानवाची शांती हरवून गेली आहे का? मनुष्य चंगळवादाच्या मागे लागला आहे का ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. समाजाला जोडण्याचे काम दत्त संस्थान करीत आहे, त्याबद्दल त्यांनी संस्थानचे अभिनंदन केले.

डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, डिजिटल इंडिया आज आपण बघतोय. जगातील क्रमांक १ ची मोबाईल बाजारपेठ ही भारत आहे. तळागाळात डिजिटल तंत्रज्ञान पोहोचले आहे. मात्र, यामध्ये सुरक्षा ही देखील महत्वाची आहे. आपण ती उपकरणे चांगल्या गोष्टींसाठी वापरली पाहिजेत. त्यासाठी आज सायबर संस्कार हे देखील होणे गरजेचे आहे.

प्रल्हाद पै म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात आपल्याला गुरु हे आवश्यक असतात. अध्यात्मामध्ये देखील सद्गुरूंची गरज असते. सद्गुरू हा निरपेक्ष असला पाहिजे. तसेच ते आत्मज्ञानी असले पाहिजेत. शहाणपण व ज्ञान घेणे आवश्यक आहे, असे सद्गुरू नेहमी सांगतात. त्यामुळे आपण प्रत्येकाकडून शिकता असतो, तेच आपले कर्तव्य आहे.

डॉ. कैलास काटकर म्हणाले, माझ्या आई-वडिलांमुळे मी इथपर्यंत पोहचू शकलो.  मला त्यांनी चांगले वळण लावले. परमेश्वर म्हणजे काय ? हे त्यांनी मला लहान पणापासून सांगितले व आचरणातून शिकविले. यातून माझा आत्मविश्वास वाढत गेला. डिजिटल इंडिया या सायबर सुरक्षित करण्याचे माझे ध्येय आहे, असेही त्यांनी सांगितले. अ‍ॅड. प्रताप परदेशी यांनी स्वागत केले. युवराज गाडवे यांनी प्रास्ताविक केले. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतील एकता सोसायटीला ८ कोटीची लाच मागणारा सहकार खात्याच्या विनोद देशमुख व भास्कर पोळला बेड्या

दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहाथ पकडलंपुणे:...

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी...

घराण्यांचे वेगळेपण जाणून घेतल्यास भिंतींचा अडथळा जाणवत नाही : पंडित अरुण कशाळकर

पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो...