Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

तिकिटासाठी बाजीरावशेठ १० वेळा दिल्लीला जातात ,पण …. अमोल कोल्हेंचे प्रचार यात्रेतून विरोधकांवर वार

Date:

पुणे- तिकिटासाठी बाजीरावशेठ १० वेळा दिल्लीला जातात पण शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी आणि प्रश्न सोडविण्यासाठी मात्र जात नाहीत अशी टीका शिरूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.१८ टक्के जीएसटी घेणारे मोदी खतांच्या गोण्यांवर देखील आपले फोटो लावतात , हजारो कोटी जाहिरातीवर उधळतात पण शेतकऱ्यांकडे पाहायला त्यांना वेळ नाही अशीही टीका त्यांनी केली आहे. आणि आता निवडणूक आयोगाचे नियम पाळण्यासाठी मोदींचे फोटो गोण्यांवरून हटवायचे म्हणून शेतकऱ्यांना खतांच्या गोण्या मिळणे मुश्कील झालेय त्यासाठी उन्हातान्हात त्यांना रांगा लावाव्या लागतात असेही ते म्हणाले.

कोल्हे म्हणाले,’ भाजपला केवळ निवडणूक दिसते त्यामुळे प्रचाराच्या हव्यासापोटी जाहिरातबाजीवर हजारो कोटी रुपये खर्च होतात. खतांच्या गोणीवर देखील पंतप्रधान मोदींचा फोटो छापले गेले, आता आचारसंहितेची बंधनं आल्यामुळे पंतप्रधान नोंदींचा फोटो हटविण्यासाठी हा वेळ लागतोय म्हणून युरियासाठी ताटकळत उभं राहावं लागत आहे, याचं स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाने द्यायला हवे.आपला भरतदेश कृषिप्रधान देश आहे आणि या देशाला मध्यप्रदेशच्या निवडणुका झाल्यापासून पूर्णवेळ कृषिमंत्री नाही, त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना कोणीही वाली राहिला नाही. म्हणून हे सरकार पूर्णपणे शेतकरी विरोधी सरकार आहे, यावर आता अनेकजण म्हणतील की, पीएम किसान सन्मान निधी दिला जातो. परंतु सर्वसामान्य शेतकरी लाखभर रुपयांची खते घालतो आणि त्यावर हे सरकार १८ % GST वसूल करून ६००० रुपये देऊन त्याला जो सन्मान म्हणता येत नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, खेड तालुक्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी युरियासाठी उन्हातान्हात रांगेत उभं राहावं लागतं त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रति भाजपच्या काय भावना आहेत हे लक्षात येतं..

दरम्यान कोल्हे यांच्या प्रचार यात्रेने रंगत निर्माण करण्यास प्रारंभ केल्याचे दिसते आहे. गावोगावी वाड्या वस्त्यांवर त्यांच्या भेटीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. त्यांचे उत्साहाने स्वागत होताना दिसते आहे. कुठे कोणी खांद्यावर घेऊन त्यांना मिरवते आहे तर कुठे बैल गाडी तून त्यांची मिरवणूक काढली जातेय .आपला शेतकऱ्यांचा बालेकिल्ला आपला गड आहे म्हणून मला महाराष्ट्रभर देखील फिरायचे आहे. तुम्ही इथला किल्ला सांभाळा असेही कार्यकर्त्यांना सांगायला ते विसरत नाहीत .

आज त्यांनी जुन्नर तालुक्यातील डिंगोरे पिंपळगाव जोगा जिल्हा परिषद गटात गावभेटी घेतल्या, यावेळी उदापूर येथे आयोजित कोपरा सभेत कोल्हे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला अमोल कोल्हे म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री तिकीट वाटपासाठी दहा वेळा दिल्लीला जातात. मात्र, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला जात नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि मंत्री शिरूरमध्ये येतात पण आम्हाला दिवसा थ्री फेज लाईट द्या या मागणीवर काही बोलत नाही. बिबट्याच्या प्रश्नाविषयी कुणी ठोस भुमिका घेत नाही, अशी तक्रार कोल्हे यांनी केलीया वेळी आमदार बाळासाहेब दांगट, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपजिल्हाप्रमुख अनंतराव चौगुले,तालुकाध्यक्ष तुषार थोरात, माजी जि.प. सदस्य शरद लेंडे, अंकुश आमले, मोहित ढमाले, माजी सभापती बाजीराव ढोले,शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक संभाजी तांबे, शरद चौधरी, सुनिल मेहेर, राहुल सुकाळे, ज्योसना महाबरे,चैताली केंगले, उदापूर ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव कुलवडे, सरपंच सचिन आंबडेकर,
विद्याविकास विकास मंडळ अध्यक्ष प्रभाकर शिंदे, पाडुरंग शिंदे, रोहिदास शिंदे, प्रकाश कुलवडे,
संजय शिंदे, संजय बुगदे, संतोष होनराव, पुष्पलता शिंदे, प्रमिला शिंदे, उदापूर ग्रामपंचायत सदस्य व नागरीक उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मंगेशकर रुग्णालयावर कारवाईसाठी न्यायालयात याचिका दाखल करणार: प्रशांत जगताप

पुणे :तनिषा भिसे प्रकरणात मंगेशकर रुग्णालयावर कारवाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेस...

दीड कोटी प्राथमिक सदस्यांची नोंदणी करून महाराष्ट्र भाजपाने रचला इतिहास

भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस खा. अरुण सिंह यांनी केले प्रदेश...

पै.सिकंदर शेखने पटकावले ५ लाखाचे बक्षीस

ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ उत्सव २०२५ संपन्न पुणे- येथील बालेवाडी...

“शिवसैनिकांनी विकासाचे दूत व्हावे” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेत नव्याने प्रवेश...