Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

तमाशा बदलला असला, तरी त्याचे मूळ स्वरूप बदललेले नाही…!

Date:

लोककला अभ्यासकांचे निरीक्षण

मुंबई -(प्रतिनिधी ) लोकपरंपरेत अनेक स्थित्यंतरे आली आणि गेली आहेत. अनेक मर्यादा ओलांडून त्यांनी आपली कुस बदलली).कारण ह्या वैश्विक कला आहेत.कालानुरूप असे बदल होत राहतील.अशा स्पष्ट शब्दात लोककला अभ्यासकांनी एका परिसंवादात आपले निरीक्षण नोंदविलेले असतानाच,आजमितीला तमाशा जरी बदललेला दिसला,तरी त्याने आपला मूळ स्वभाव सोडला नाही. त्याचे स्वरूप ही बदलले नाही.असा ठाम विश्वास ही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या सहयोगाने कलिना येथील मुंबई विद्यापीठात येथे बुधवारी (दि.27मार्च) रोजी “आधुनिक तमाशाची जडण – घडण”या विषयावर लोककलेचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.
या चर्चा सत्रात लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, अकॅडमी ऑफ थिएटर आर्टसचे प्रा. डॉ. मंगेश बनसोड, जेष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड सहभागी झाले होते. तर डॉ मोनिका ठक्कर यांनी या चर्चा सत्राचे सूत्रसंचालन केले.
जडण घडण म्हणजे काही तरी घडलेले असते. तमाशात एकाच वेळी गण गौळण बतावाणी, वगनाट्य दाखविली जातात. तमाशात सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, रजवाडी वगनाट्य दाखविली जातात.त्यामध्ये विविधता असते.या कलेत सतत बदल होत असतात. तरी तमाशाने कधी ही आपले मुळ स्वरूप बदलेले नाही. मात्र कालांतराने या लोककलेला अनेक मर्यादा ओलांडाव्या लागल्या. कारण ह्या वैश्विक कला आहेत. या कलेमध्ये आव्हानं स्वीकारण्याचे सामर्थ्य आहे.असे स्पष्ट मत लोककलेचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी व्यक्त केले.
तर आधुनिक तमाशाची जडण घडण याविषयावर बोलताना प्रा. डॉ गणेश चंदनशिवे यांनी विविध विषयाला हात घालून तमाशाची सुरुवातीपासूनची परंपरेची माहिती दिली.जेव्हा – जेव्हा स्थित्यंतरे आले, तेव्हा – तेव्हा तमाशाने आपली कूस बदललेली आहे.प्रत्येक चळवळीत तमाशाने समजाला साथ दिली. मग ते लोकनाट्य माध्यमातून असो. की वगनाट्यातून. सुरुवातीला तमाशाचे स्वरूप ओबड धोबड होते. विधिनाट्यातून तमाशाचा जन्म झाला.आख्यानातून तमाशा सादर केले जायचा.तमाशाचा उल्लेख अनेक संतांच्या लेखणीतून आला. पारशी, अरबी, उर्दू भाषेमध्ये ही तमाशाचा उल्लेख आहे.तमाशाने वगातून समाजप्रबोधन केले.येवढी लेखणीत ताकद असायची. मात्र अलीकडे लिहिणार माणूस सापडत नाही. त्यामुळे तमाशाचे बलस्थान हरवत चालले की काय?याची चिंता वाटू लागली असल्याचे यावेळी डॉ. चंदनशिवे यांनी स्पष्ट केले.
तमाशाला अडीचशे ते तीनशे वर्षाची परंपरा आहे.अनेक टप्प्यात तमाशात बदल होत गेलेत . मात्र सध्याच्या तमाशावर चित्रपटाचा प्रभाव पडला आहे. त्यामुळे तमाशाचे मूळ अस्सल बीज कोमजले आहे. काळानुरूप बदल होत राहतील. पण गण गौळण वगनाट्य सारखी परंपरा जपली पाहिजे. अशी अपेक्षा यावेळी अकॅडमी ऑफ थिएटरचे प्रा डॉ. मंगेश बनसोड यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी युरोपमध्ये एका लोककलेच्या सेमिनारमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना काही मजेशीर आठवणी ही सांगितल्या.आम्ही युरोपमध्ये 36 देशातील विदयार्थ्यांसमोर इंग्रजीतून गण साजरा केला. बतावणी इंग्रजीतून केली. तीन दिवसात गण गौळण बतावणी इंग्रजीतून सादर करणे सोपे काम नव्हते. पण ते आव्हान आम्ही स्वीकारले होते. कलेची वर्तमानाची नाळ जोडताना, कलावंतांनी पारंपारिकता जपली पाहिजे.असा मोलाचा सल्ला ही यावेळी त्यांनी दिला.
पाश्चात संस्कृतीमुळे तमाशाचे विद्रुपीकरण होवू नये. सध्या तमाशात चित्रपटाची गाणी सादर केली जातात.जवळ जवळ आता वगनाट्य सादर केली जात नाहीत.मात्र किती ही सामाजिक संकट आली, तरी तमाशा कलावंतांनी आपले मूळ स्वरूप हरवू देवू नये. असे यावेळी आपले स्पष्ट मत जेष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड यांनी व्यक्त केले.
लोककला अकादमीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शिवाजी वाघमारे यांनी शिलकार गाऊन वातावरण तमाशामय केले. परिसंवादाच्या शेवटी अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असा गण गाऊन कलारसिकांच्या टाळ्या मिळविल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोरियन सांस्कृतिक महोत्सवाने जिंकली पुणेकरांची मने

फॅशन शो, के-पॉप, फ्यूजन संगीत व कोरियन खाद्य-संस्कृतीच्या स्टॉलना...

राज्यपाल आचार्य देवव्रत यांची सभापती व उपसभापती यांनी घेतली सदिच्छा भेट

नागपूर, दि. ७ डिसेंबर २०२५ : मुख्यमंत्री यांच्या ...

जागतिक वारसास्थळांवर मूलभूत सुविधांची दयनीय अवस्था-प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यांकडून राज्यसभेत मुद्दा उपस्थित

विशेष 'हेरिटेज इन्फ्रा पॅकेज'ची मागणी पुणे: महाराष्ट्रातील युनेस्को मानांकन असलेल्या किल्ल्यांवर,...