Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

केवळ आंदोलने आणि असहकार चळवळ करून स्वातंत्र्य मिळालेले नाही- माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन

Date:

 मी सावरकर वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा
पुणे : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ‘दे दि हमें आझादी बिना खड्ग बिना ढाल’ ही भावना भारतीयांची होत गेली , हे अंशतः खरे पण आहे, परंतु आम्ही खड्ग उचलण्याच्या लायक नाही का? कुणीतरी म्हटले चले जाव आणि परकीय गेले असे आहे का? त्याच्याआधी  स्वातंत्र्यासाठी किती लोकांनी आपले रक्त सांडले, किती लोकांना बलिदान द्यावे लागले. स्वातंत्र्य मिळविण्याचा इतिहास मोठा आहे. केवळ आंदोलने आणि असहकार चळवळ करून स्वातंत्र्य मिळाले नाही, परंतु महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याचा विचार घराघरात पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम केले, असे मत माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केले.

मी सावरकर वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँफि थिएटर मध्ये झाला. यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, लोकमान्य मल्टिपर्पजचे सुशील जाधव, ज्येष्ठ अभिनेते डॉ. नितीश भारद्वाज, पंडित शौनक अभिषेकी, सीए. धनंजय बर्वे, सीए. रणजीत नातु, सीए. अमेय कुंटे, प्रवीण गोखले, शैलेश काळकर, रवी ढवळीकर यावेळी उपस्थित होते. प्रसाद माधवराव कुलकर्णी हे या वक्तृत्व स्पर्धेचे महाविजेते ठरले.

सुमित्रा महाजन म्हणाल्या, स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांमध्ये स्वातंत्र्याची भावना जागृत झालेली दिसली नाही. परंतु आज इतक्या वर्षानंतर गावागावात ‘आमच्याकडे पण कोणीतरी क्रांतिकारी होते’ याची आठवण उत्स्फूर्तपणे होत आहे.

त्या पुढे म्हणाल्या, आपण सतत पराभूत होतो ही भावना जाणून बुजून रुजवण्यात येत होती. विजयाच्या आठवणी पुसल्या गेल्या होत्या. परंतु अटक ते कटक, विजयनगर साम्राज्य ह्या आपल्या विजयाच्या आठवणी आहेत. ६५ वर्षात माझा देश स्वतंत्र आहे, हा भाव जागृत होणे गरजेचे होते, तर ते टिकवण्याची आणि बलशाली करण्याची ताकद आली असती. परंतु ते आता होत आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर उपेक्षित नव्हते त्यांना पेलायची ताकद आता आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रमोद रावत म्हणाले, सध्याच्या राजकारणात आपल्या महान नेत्यांचा, त्यांच्या विचारांचा अपप्रचार होत आहे. तो थोपविण्यासाठी मेहनत लागते. यासाठी विचारांचे पाईक घडवावे लागतात. अशी मेहनत समाजात पुढे घेऊन जावी लागते, हे काम मी सावरकर वक्तृत्व स्पर्धेतून होत आहे.

वक्तृत्व स्पर्धा विविध गटातील प्रथम क्रमांकाचे विजेते –  १) नित्य श्रद्धा निळकंठ पवार (गट – इयत्ता पाचवी ते आठवी), वेदांत पंकज बागुल (इयत्ता ९ ते १२ वी), ईश्वरी दीपक डाखोळे (महाविद्यालयीन विद्यार्थी), सतीश सगदेव (ज्येष्ठ गट), तृप्ती अभिजीत यरनाळकर (युवा गट), संतोष कानडे (वरिष्ठ गट), मधुमंजिरी गटणे (नवनिर्मित काव्यरचना), माही आशिष गाडगीळ, अनुजा पेठे (वादविवाद, कौशल्य),  सारंग हेरंब चिंचणीकर आसावरी अमित बर्वे (नाट्यवाचन), गायत्री प्रसाद यरगुद्दी (संगीतमय सावरकर)

सुरभी नातू यांनी सूत्रसंचालन केले. रणजीत नातु यांनी प्रास्ताविक केले. सीए अमेय कुंटे यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कम ऑन किल मी.. आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे म्हणाले …. मरे हुए क्या मारना,मतदारांनीच तुमचा मुदडा पाडला

मुंबई: विधानसभा निवडणुकीतील कामगिरीची आकडेवारी सांगत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे...

वारकऱ्यांची निःस्वार्थ सेवा म्हणजे पांडुरंगाचा प्रसाद:उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भावना

वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ 'सिंबायोसिस' व सौ. शीला राज...

पुण्यात पाऊस सुरूच… मुठेत आता 15 हजाराचा विसर्ग

पुणे: शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस...