पुणे-लोकसभेच्या रणांगणात देशात नमो ना कोणाचे आव्हान पेलायचे असेल तर ते म्हणजे राहुलगांधींचे आणि प्रियांका गांधींचे , या दोन नावाची नमोंना भयंकर भीती वाटते असे बोलले जाते . पण केवळ गांधी या नावानेच काँग्रेस पक्ष चालत आला हेही तेवढेच खरे आहे. या पक्षाला लोक चांगले मिळत नाहीत हे या पक्षाची दुरावस्था होण्यामागचे सरावात पहिले आणि प्रमुख कारण आहे. तरीही गांधी या नावावर हि सर्वधर्मभावची नौका पार होते आहे . जिची मोदी :शहांना त्यांच्याकडे सारे काही असूनही धडकी भरते आहे. ज्या पक्षाने कलमाडी ,लालू यादव यांचे अपराध देखील माफ केले नाहीत, या पक्षाला अजूनही चांगली माणसे मिळू नयेत हे या पक्षाचे दुर्दैव मानले जाते.
महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पुण्यातल्या काँग्रेस भवनावर अत्यंत चांगले आणि अत्यंत वाईट दिवस पाहण्याची वेळ वारंवार आली, पण अलीकडे या भूमीच्या ,भवनाच्या नशिबी मात्र चांगले दिवस येणार काय ? हे कॉंग्रेस भवन’ सच्चे सेवको के लिये खिदमतगारोका घर बने’ … हे गांधीजींनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार कि हे ठेकेदारों के लीये खिदमत घर बनणार ? हेच आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मोदी सरकारला या देशावर १० वर्षे जनतेने संधी दिली .या १० वर्षातील कारकीर्द पाहता जनता आता पुन्हा कॉंग्रेसला संधी देईल असे मानणारा मोठा वर्ग देशात आहे. पण लोकसभेची उमेदवारी देताना या पक्षाची कसोटी लागणार आहे. या संधीचे सोने करायला अनेकजण टपून आहेत, आणि त्यात काही धर्मांध , काही मॅजीक वाले , काही दलबदलू आहेत हेही जनता जाणून आहे. जी गरिबोंके लिये खिदमत गारों का मकान नाही तर कॉंग्रेस भवन हे ठेकेदारोंके लिये खिदमत घर बनवतील यात शंका नाही . आणि अशाच लोकांच्या नावाची उमेदवारी देताना प्रदेश पातळीवरच्या नेत्यांना भुरळ पडू लागली आहे हे वास्तव आहे .
पुणे लोकसभा निवडणुकीत महापालिकेच्या गेल्या सत्ताकाळातील कोणत्याही पदाधिकाऱ्याला कॉंग्रेस मुक्त भारत करू पाहणाऱ्या भाजपने उमेदवारी दिली तर हातून निसटलेला कॉंग्रेसचा हा गड पुन्हा हाती मिळवायची हि निवाद्नुक्म्हन्जे नामी संधी मानली जाते. आता हि संधी घालवायची कि आपली तत्वे , निष्ठा , प्रामाणिकपणा पाळत या संधीचे सोने करायचे हे प्रादेशिक नेत्यांच्या हाथी आहे. येत्या ५ आणि ६ तारखेला मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होणार आहे ज्यात जागा वाटप निश्चित होईल आणि कॉंग्रेसच्या पहिल्या पसंतीच्या २/३ उमेदवारांची नावे दिल्लीदरबारी पाठवली जातील असा अंदाज आहे.आणि १० तारखेला कॉंग्रेसची पहिली यादी जाहीर होईल असे सांगितले जाते आहे.
पुण्याच्या कॉंग्रेस मधून अनेकजणांनी उमेदवारी मागितली आहे ओबीसी वर्गाला उमेदवारी द्यायची म्हणून एखादे नाव पुढे रेटण्याचा प्रयत्न होतो आहे. पण वेगवेगळ्य पक्षात नेत्यांना दगा देऊन , वेगवेगळ्या ठिकाणी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी,मारहानीच्या धमक्या देत,आपण मोठ्ठे पूजक आहोत असे चित्र दाखवीत देवादिकांचा धाक निर्माण करून अंध श्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या , कॉंग्रेस विरोधी धोरणाच्या इच्छुकाला उमेदवारी देण्याचा घाट घातला जातोय अशी अनेकांची समजूत होऊ लागलीये.आणि याच समजुतीतून संबधीताच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची हव्वा हि पसरवली जाते आहे. सर्वात वाईट म्हणजे सारे पक्ष निष्ठ हे शांतपणे पाहत आहेत आणि याबाबत दिल्लीपर्यंत माहिती न्यायला देखील कुणी पुढे यायला तयार होईना हे आणखी मोठे दुर्दैव आहे. पण सत्य कधी झाकले गेलेय काय ?झाकले जाणार आहे काय ? या प्रश्नांचे उत्तरे आता या पक्षातील होणाऱ्या हालचालींच देतील यात शंका नाही .
पुण्यातून भाजप विरोधातील लढाई तशी सोपी नाही
काँग्रेस पक्षातून यंदाची लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे ,निष्ठावंत म्हणून पक्षाची मोट नेहमी पुढे नेऊ पाहणारे माजी आमदार मोहन जोशी ,शिवसेनेचे रमेश बोडके यांचा पराभव करून नगरसेवक झालेली आणि मनसे चे नगरसेवक केलेले आणि आताचे कसब्यात आपला झेंडा रोवलेले आमदार रवींद्र धंगेकर, नागरी संघटनेचे ना. तू. पवार यांचा पराभव करून राजकारणात सक्रिय झालेले आणि शांत स्वभावाचे म्हणून परिचित असलेले व्यापारी वर्गाचाही पाठिंबा मिळविलेले अभय छाजेड , वारंवार महापालिका निवडणुकीत विजय मिळवीत कायम आयुष्यभर नगरसेवक पदी काम करत राहिलेले काँग्रेसचे निष्ठावंत आबा बागुल अशी प्रमुख नावे रेस मध्ये आहेत.लोकांना काँग्रेस हवी आहे, पण काँग्रेस चांगल्या लोकांना पुढे स्थान देत नाही हि कायम तक्रार राहिली आहे. तसे पाहिले तर काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांना उमेदवारी मिळाली तर ते निवडून येऊ शकतात असा अनेकांचा अंदाज आहे पण पक्षातील अंतर्गत पाय खेचाखेची च्या राजकारणात त्यांनी माघार घेतल्याचे दिसले आहे.दीप्ती चवधरी यांनी आपल्या महापौर पदाच्या कारकिर्दीत चांगले काम केले आहे .पण त्याही निवडणूक लढवू इच्छित नाहीत . निवडणूक लढविण्यासाठी आवश्यक असलेले बळ अनेक चांगल्या उमेदवारांकडे नाही हे हि तितकेच खरे आहे. पण त्याचबरोबर निवडून येण्याची क्षमता हा एकच निकष महत्वाचा मानायचा झाले तरी कॉंग्रेसकडे २/३ इच्छुक यंदाही आहेत फक्त त्या योग्य निष्ठावंत चेहऱ्यांना प्रादेशिक नेते ओळखू शकणार काय ? हि त्यांचीच कसोटी ठरणार आहे.