महारोजगार मेळवा हा काही त्यांच्या माता-पित्यांचा आहे का?
मुंबई-नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे दोन वीर, महानुभाव सत्तेत आल्यापासून ही सुसंस्कृत राजकारणाला वाळवी लागलेली असल्याचा टीका देखील खासदार संजय राऊत यांनी केली आहे.घाणेरडे राजकारण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केला असल्याचा आरोप त्यांनी केला. अलीकडच्या काळात देवेंद्र फडणवीस डर्टी पॉलिसी पॉलिटिक्स करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
बारामती मध्ये होणाऱ्या महारोजगार मेळाव्याचे आमंत्रण शरद पवार यांना देण्यात आलेले नाही. यावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर चांगलीच टीका केली आहे. अशा प्रकारचे राजकारण ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती, सरकारी कार्यक्रमास सत्ताधारी पक्षाचा आमदार किंवा खासदार नाही म्हणून त्या व्यक्तीला बोलवायचं नाही, असं कधीच होत नव्हतं. महारोजगार मेळवा हा काही त्यांच्या माता-पित्यांचा आहे का? असा संतप्त सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. महारोजगार मेळावा ही सरकारी योजना आहे. ती भाजपची किंवा शिंदे यांची योजना नाही. विद्यमान खासदार आणि आमदार हे सरकारी योजनांचा भाग असतात. तरीही शरद पवारांना का बोलवण्यात आलं नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केला असल्याचा आरोप त्यांनी केला. अलीकडच्या काळात देवेंद्र फडणवीस डर्टी पॉलिसी पॉलिटिक्स करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
बारामती मध्ये होणाऱ्या महारोजगार मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र असे असले तरी राज्यसभेचे खासदार म्हणून बारामती शहरात राहणारे एक शरद पवार यांना या कार्यक्रमाचे नियंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे विरोधकांच्या वतीने राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
महारोजगार मेळाव्यावरून खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर चांगली टीका केली. हा कोणता खेळ चालला आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यासाठी लागणारे पैसे तुमच्या घराच्या झाडाला आलेत का ? वर्षा बंगल्यावर सागर बंगल्यावर किंवा देवगिरी बंगल्यावर जी झाडंं आहे त्यांना खोके लागलेत का? असा संतप्त सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कार्यक्रम कराल आणि स्थानिक आमदार खासदारांना निमंत्रण देणार नाही. हा कुठला प्रकार आहे? असा प्रश्न त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे दोन वीर, महानुभाव सत्तेत आल्यापासून ही सुसंस्कृत राजकारणाला लागलेली वाळवी असल्याचा टीका देखील खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
बारामती शहरात होणाऱ्या महारोजगार मेळाव्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती मध्ये एकाच वेळी दाखल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर ही सर्व नेते मंडळी एकाच वेळी बारामती मध्ये येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री जेवणाचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह दोन्ही उपमुख्यमंत्री शरद पवार यांच्या घरी जेवणाचे निमंत्रण स्वीकारतात का? ते पाहावे लागेल.