मुंबई-मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची SIT चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला दिले आहेत. तसेच जरांगे यांच्या संदर्भात मला घेणंदेणं नाही. मात्र त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे शोधणारच असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी आज सभागृहात जरांगे यांच्या आंदोलनाची चौकशी करण्याची मागणी केली होती. यानंतर आता जरांगे यांच्या आंदोलनाची आता SIT चौकशी केली जाणार आहे.
यावेळी फडणवीस म्हणाले, ”मला याविषयी बोलायचे नव्हते. मराठा सामाजच्या संदर्भात मी काय केले हे महाराष्ट्राला माहीत आहे. मी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिल ते हायकोर्ट टिकले. मराठा समाजासाठी काय केले यासाठी मला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. जरांगे पाटील माझ्याविषयी बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला”, असे फडणवीस म्हणाले.
तसेच ”शिवाजी महाराजांचे नाव घ्याचचं आणि दुसऱ्यांना शिव्या द्यायच्या. लाठीचार्जच्या आधी मनोज जरांगे यांना परत कोणी आणलं, त्यांना घरी कोणं भेटलं, हे शोधायला हवं असे फडणवीसांनी म्हटले आहे. तसेच आरोपी सांगत आहे की, दगडफेक करायला कोणी सांगितले. पोलिस आपले नाहीत का? समाजाला विघटीत करण्याचा प्रयत्न होतोय. त्यांना पैसे कोण देतेय, त्यांना मदत कोण करतंय, हे सर्व बाहेर येईल”, असे फडणवीसांनी म्हटलं आहे.
पुढे फडणवीस म्हणाले, ”तुमच्याबदल जर कोणी बोलले तर, तुमच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस राहतील. जरांगे पाटील यांच्या संदर्भात मला घेणं देणं नाही, मात्र त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे शोधल जाईल. औरंगाबाद याठिकाणी वाॅर रुम कोणी सुरु केली, याची सखोल चौकशी होईल”, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.