मुंबई-मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पाहिल्यानंतर भाजप नेते आमदार प्रसाद लाड म्हणाले की, आता जरांगे यांनी नौटंकी आता बंद करावी. समाजाच्या नावाखाली मागच्या सात आठ वर्षात स्वत:चा राजकीय वरदहस्त करण्याचा प्रयत्न जो जरांगे राजकीय वरदहस्त करण्याचा जो प्रय्त्न करत होते, यामागचा बोलविता धनी कोण आहे? सिल्वर ओक आहे की जालन्यामधील भैय्या फॅमिली आहे. हे आता लोकांसमोर यायला लागलं आहे .
तुम्हाला दहा वेळा सांगितलं की फडणवीसांचं नाव घेऊ नका. ज्या फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार आहेत. ज्या फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण दिलं. फडणवीसांचं नाव घ्यायला तुम्हाला कोण लावतंय, आता हे पुढे आलंय. पुन्हा एकदा फडणवीसांनी आरक्षण दिल्यानंतर आपली खेळलेली खेळी संपली. हे आज लक्षात येतंय. समाजाच्या नावावर लेकरु लेकरु करुन ढेकरु देण्याचं बंद करा. आरक्षणामुळे मराठा समाज खूष आहे. तुमच्या सल्ल्याची समाजाला गरज नाही, असे प्रसाद लाड म्हणाले.