पुढारीच्या पत्रकाराला पोलिसांनी केलेय धक्काबुक्कीबाबत कारवाई झालेली आहे,हवे तर पुन्हा रिव्हिजन घेऊ
mymarathi.netपुणे- निखील वागळे यांनी पोलिसांच्या सूचना ऐकल्या नाहीत म्हणून त्यांच्यावर हल्ला झाला पण तिथेही पोलीस त्यांच्या संरक्षणासाठी होतेच त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली ,पण याचा अर्थ हल्लेखोरांना निखील वागळे यांचा खून करायचा होता किंवा त्यांच्या खुनाचा प्रयत्न झाला असे म्हणता येणार नाही असा स्पष्ट दावा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला आहे.याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजीनगर येथे आयोजित पाण्याच्या टाकीच्या कार्यक्रमात पुढारी च्या वार्ताहराला पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्की संदर्भात योग्य कार्यवाही झालेली आहे हवे असल्यास आपण पुन्हा त्याबाबत पुनर्परीक्ष्ण करू असे ते म्हणाले.

