Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

वाचनालये ही ज्ञान सुरक्षित ठेवण्याच्या सांस्कृतिक वाहिन्या-साहित्यिक भारत सासणे

Date:

: पुणे नगर वाचन मंदिराच्या १७६ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम व पुरस्कार वितरण
पुणे : केवळ एखादी वास्तू, काही सभासद आणि भरपूर पुस्तके असा प्रकार म्हणजे वाचनालय, असे नाही. तर वाचनालये आपल्याला जगण्याचे मूल्य देतात. वाचनालये ही ज्ञान सुरक्षित ठेवण्याच्या सांस्कृतिक वाहिन्या आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक व साहित्यिक भारत सासणे यांनी केले.

पुणे नगर वाचन मंदिर संस्थेच्या १७६ व्या वर्धापनदिनानिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी पुणे नगर वाचन मंदिर संस्थेचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे, उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, कार्यवाह सुवर्णा जोगळेकर, सहकार्यवाह डॉ. प्रसाद जोशी, रोहित जोगळेकर, कार्यकारिणी सदस्य सर्वश्री अरविंद रानडे,  रवींद्र चौधरी, केदार पटवर्धन, दीपक पाथरकर, संकेत देशपांडे, प्रशांत कुलकर्णी, प्रशांत टिकार, राजीव मराठे, केतनकुमार पाटील, विनायक माने, संगीता पुराणिक, गौरी कुलकर्णी, शुभांगी केळकर,  स्वाती ताडफळे, गायत्री सावंत आदी उपस्थित होते.

कै. आर.एल. नगरकर प्रतिष्ठान पुरस्कृत डॉ. श्री. व्यं. केतकर वाचन चळवळीतील आदर्श कार्यकर्ता पुरस्कार श्यामसुंदर जोशी, ऍड. शरद तपस्वी आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार चैत्राम पवार यांना आणि कवी ह.स. गोखले संत साहित्य विषयक ग्रंथलेखन पुरस्कार विद्याधर ताठे यांना प्रदान करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह, रोप आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते.

भारत सासणे म्हणाले, कोणत्याही देशाला गुलाम करायचे झाले तर तेथील वाचनालयांवर हल्ला केला जातो, हे इतिहास आपल्याला सांगतो. त्यामुळे नालंदा सारखी अनेक उदाहरणे समोर आहेत. आज महत्वाच्या आणि प्रकाशित झालेल्या पुस्तकांकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यावर चर्चा होत नाही, वाचक वाचत नाहीत आणि ती पुस्तके विस्मरणात जातात. समाजात पुस्तकांबद्दल अनास्था निर्माण झाली आहे. समाज मनोरंजनाकडे जास्त वळला असून वैचारिकतेपासून समाज दूर जात आहे.

ते पुढे म्हणाले, तरुण पिढी वाचनापासून दूर जात आहे. हे आपल्याला आपल्या कुटुंबातून जाणवते. ज्यांच्यासाठी आपण लिहितो, ती पिढी आपल्यापासून दूर गेली आहे. यामुळे अरसिकता, अडाणीपणा यातून निर्माण होणार असल्याचे चित्र आहे. बालकुमार साहित्य हा आपला वारसा आहे, मात्र त्यात जुनी मराठी भाषा आहे. त्यामुळे बालकुमार साहित्यातील लहान मुलांना काय द्यावे, हा सगळ्यांसमोर प्रश्न आहे.

श्यामसुंदर जोशी म्हणाले, ग्रंथ या शब्दाची महती आपल्याला समजलेली नाही. वाचन करणाऱ्यांमध्ये अक्षर वाचन करणारे खूप आहेत. अक्षर वाचन म्हणजे वाचन नाही. आपल्याला माणूस वाचता आला पाहिजे. राजकीय आणि देशाच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे कुटुंबातील व्यक्तींचा स्वभाव वाचता येणे म्हणजे वाचन होय. जपान मध्ये सगळ्यात जास्त पुस्तके वाचली जातात, असेही त्यांनी सांगितले.

विद्याधर ताठे म्हणाले, संतसाहित्य हे मराठी साहित्याचे सत्व आहे. तब्बल १२ व्या शतकाच्या आधीपासून संतासहित्याचा प्रवास सुरु होतो. महाराष्ट्र ही शूर वीरांसह संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात जेवढे संत झाले तेवढे कोठेही झाले नाहीत, हे आपल्याला समजले नसून हे आपले करंटेपण आहे. घरातील केवळ एकाने संत म्हणून नाही, तर आपल्याकडे संतपरंपरेत संपूर्ण कुटुंबाने सहभाग घेत अलौकिक कार्य केले आहे, हे महाराष्ट्रातील संतपरंपरेचे वैशिष्ट्य आहे. 
आदर्श सामाजेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले चैत्राम पवार यांनी आपल्या सामाजिक कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे यांनी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचे प्रतिपादन  केले व पुणे नगर वाचन मंदिर संस्थेने दुर्मिळ ग्रंथांच्या डिजिटायझेशन या प्रकल्पाद्वारे  वाचन संस्कृती संवर्धनासाठी तंत्रज्ञानाचा अंगिकार केला असे विचार अध्यक्षीय मनोगतात व्यक्त  केले.

कार्यवाह सुवर्णा जोगळेकर यांनी प्रास्ताविक केले. स्वाती ताडफळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. रोहित जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले. संकेत देशपांडे यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...